Book Title: Death Before During and After Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 16
________________ मृत्यूवेळी, आधी आणि नंतर लोकां द्वारे तुझा कैद्यासारखा उपयोग करुन घेतला जाईल. म्हणून भगवंत म्हणतात की, तुझे मन-वचन-काया आणि आत्म्याचा उपयोग दुसऱ्यांसाठी कर, आणि मग तुला जर कोणतेही दुःख आले तर मला सांग. आणखी कुठे जाणार ? प्रश्नकर्ता : देह सुटल्यानंतर परत यावे लागते का ? 5 दादाश्री : दुसरे कुठेच जायचे नाही. इथल्या इथेच, आपल्या आजूबाजूला जे बैल-गाय बांधतात, जवळपास जे कुत्रे राहतात ना, आपल्या हातांनीच खातात, पितात, आपल्या समोरच बघत असतात, आपल्याला ओळखतात, ते आपलेच मामा आहेत, काका आहेत, सगळे तेच, इथल्या इथेच असतात. म्हणून त्यांना मारु नका. खायला द्या. ते तुमच्या जवळचेच नातेवाईक आहेत. तुम्हाला चाटायला सुद्धा येतात, बैल सुद्धा चाटतात. रिटर्न तिकीट प्रश्नकर्ता : गायी-म्हशींचा जन्म मध्येच का मिळतो ? दादाश्री : हे तर अनंत जन्मापासून, हे लोक सगळे आले आहेत, ते सर्व गायी- म्हशीमधूनच आले आहेत. आणि इथून जे जाणार आहेत, त्यातून पंधरा टक्के सोडून बाकी सगळे तिथले रिटर्न तिकीट घेऊन आले आहेत. कोण-कोण तेथील तिकीट घेऊन आले आहेत ? तर जे भेसळ करतात, जे बिनहक्काचे बळकावतात, बिनहक्काचे उपभोगतात, जिथे बिनहक्काचे असेल तिथे जनावराचा जन्म मिळतो. मागील जन्मांची विस्मृती प्रश्नकर्ता : आम्हाला आमचा मागील जन्म का आठवत नाही ? आणि समजा आठवला तर काय होईल ? दादाश्री : तो कोणाला आठवतो की ज्याला मरतेवेळी जरा सुद्धा दुःख झाले नसेल आणि येथे चांगला आचार-विचार करणारा असेल,

Loading...

Page Navigation
1 ... 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62