________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
33
त्याच्यासोबत इन्द्रिय वगैरे काहीही जात नाहीत. केवळ हे क्रोध-मानमाया-लोभ जातात, त्या कारण-शरीरात क्रोध-मान-माया-लोभ हे सगळेच येतात. आणि सूक्ष्म शरीर कसे असते? जोपर्यंत मोक्षाला जात नाही, तोपर्यंत सोबत राहते. कुठेही जन्म होऊ दे, पण हे सूक्ष्म शरीर तर सोबतच असते.
इलेक्ट्रिकल बॉडी आत्मा देहाला सोडून एकटा जात नाही. आत्म्याबरोबर सर्व कर्म, जे कारण शरीर म्हटले जाते ते, मग तिसरे इलेक्ट्रिकल बॉडी (तेजस शरीर). हे तिन्ही सोबत निघतात. जोपर्यंत
___ हा संसार आहे, तोपर्यंत प्रत्येक जीवात इलेक्ट्रिकल बॉडी असतेच! कारण शरीर बनले की इलेक्ट्रिकल बॉडी सोबतच असते. इलेक्ट्रिकल बॉडी प्रत्येक जीवात सामान्य भावाने असतेच आणि त्या आधारावर आपले सर्व चालत असते, जेवण जेवतो ते पचवण्याचे काम इलेक्ट्रिकल बॉडी करते. रक्त वगैरे बनते, रक्त शरीरात वरती चढवणे, खाली उतरवणे हे सगळे कार्य आतमध्ये करत राहते. डोळ्यांनी दिसते, तो लाईट या इलेक्ट्रिकल बॉडीच्या कारणाने असतो. आणि हे क्रोध-मान-माया-लोभ ते सुद्धा या इलेक्ट्रिकल बॉडीच्या कारणानेच होतात. आत्म्यामध्ये क्रोधमान-माया-लोभ नाहीच. हे चिडणे हे सगळे इलेक्ट्रिकल बॉडीचे शॉक (आघात) आहेत.
प्रश्नकर्ता : म्हणजे 'चार्ज होण्यामध्ये' इलेक्ट्रिकल बॉडी काम करत असेल ना?
दादाश्री : इलेक्ट्रिकल बॉडी असेल, तेव्हाच चार्ज होते. इलेक्ट्रिकल बॉडी नसेल, तर हे सर्व चालणारच नाही. 'इलेक्ट्रिकल बॉडी' असेल आणि आत्मा नसेल तरीही काहीच चालणार नाही. हे सारे समुच्चय 'कॉजेस' आहेत.