________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
पडणे आणि कृष्ण भगवंतांनी सांगितले आहे की योनीमध्ये बीज पडते आणि त्यामुळे हा संसार उभा राहिला आहे. योनीत बीज पडणे बंद झाले की त्याचा संसार समाप्त झाला.
38
विज्ञान वक्रगतीचे आहे
प्रश्नकर्ता: 'थिअरी ऑफ इवोल्युशन' (उत्क्रांतीवाद ) च्या अनुसार जीव एक इन्द्रिय, दोन इन्द्रिय असे 'डेव्हलप' होत-होत मनुष्यात येतो आणि मनुष्यातून परत जनावरात जातो. तर या 'इवोल्युशन थिअरी' मध्ये जरा विरोधाभास वाटतो. ते जरा स्पष्ट कराल ?
दादाश्री : नाही. यात विरोधाभासासारखे काहीच नाही. 'इवोल्युशनची थिअरी' सगळी बरोबर आहे. केवळ मनुष्यापर्यंतच 'इवोल्युशनची थिअरी' करेक्ट आहे. मग त्याच्या पुढची गोष्ट ती लोकं जाणत नाहीत.
प्रश्नकर्ता : मनुष्यातून पशुमध्ये परत जातो का ? प्रश्न हा आहे.
दादाश्री : असे आहे. आधी डार्विनची थिअरी 'उत्क्रांतीवादा'च्या अनुसार ‘डेव्हलप’ होत-होत मनुष्यापर्यंत येतो आणि मनुष्यात आला म्हणून ‘इगोइजम' (अहंकार) सोबत असल्यामुळे कर्ता होतो. कर्माचा कर्ता होतो, म्हणून मग कर्मानुसार त्याला भोगण्यासाठी जावे लागते. 'डेबिट' (पाप) करेल तेव्हा जनावरात जावे लागेल आणि 'क्रेडिट' (पुण्य) करेल, तेव्हा देवगतीत जावे लागेल किंवा मग मनुष्य गतीत राजपद मिळेल, अर्थात मनुष्यात आल्यानंतर परत 'क्रेडीट' आणि 'डेबिट' वर अवलंबून आहे.
नंतर नाहीत चौऱ्यांशी योनी
प्रश्नकर्ता : परंतु असे म्हणतात ना की, मानवजन्म की जो चौऱ्याशी लक्ष योनीमध्ये भटकल्यानंतर मिळतो, तर त्याला परत एवढे भटकावे लागते त्यानंतर मानवजन्म मिळतो ?
दादाश्री : नाही. असे काही नाही. एकदा मनुष्यजन्म मिळाला तर