________________
42
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
एक चौदा वर्षांचा मुलगा असेल, त्याची उंची चार फुट आणि चार इंच असेल आणि अठराव्या वर्षी पाच फुट उंची असेल. तेव्हा म्हणतात की चार वर्षात आठ इंच वाढला. तेव्हा तो सतराव्या वर्षी किती वाढेल? असे कॅल्क्युलेशन करतो, अशाच प्रकारे हे जनसंख्येचे कॅल्क्युलेशन करतात.
मुलांना दुःख का? प्रश्नकर्ता : निर्दोष मुलाला शारीरिक वेदना भोगावी लागते, त्याचे कारण काय?
दादाश्री : मुलाच्या कर्माचा उदय मुलाला भोगायचा आहे आणि 'आई'ला तो बघून भोगायचा आहे. मूळ कर्म मुलाचे आहे, त्यात आईची अनुमोदना होती. म्हणून 'आई'ला ते बघून भोगायचे आहे. म्हणजे करणे, करविणे आणि अनुमोदना करणे हे तीन कर्मबंधनाची कारणे आहेत.
मनुष्य जीवनाची महत्ता मनुष्य देहात आल्यानंतर अन्य गतीमध्ये जसे की देव, तिर्यंच अथवा नरकात जाऊन आल्यानंतर परत मनुष्यदेह प्राप्त होतो. आणि भटकंतीचे अंत, हे सुद्धा मनुष्य देहातूनच मिळते. हा मनुष्य देह जर सार्थक करता आला तर मोक्षाची प्राप्ती होऊ शकेल असे आहे, नाही तर भटकण्याचे साधन वाढवेल, असेही आहे ! दुसऱ्या गतींमध्ये केवळ सुटत जातो. परंतु यात दोन्हीही आहे. सुटतो आणि सोबतच बांधला जातो. दुर्लभ मनुष्य देह प्राप्त झाला आहे तर त्यापासून आपले (मोक्षाचे) काम काढून घ्या. अनंत जन्म आत्म्याने देहासाठी घालवले आहेत. एक जन्म जर देह आत्म्यासाठी काढेल तर कामच होऊन जाईल.
मनुष्य देहातच जर ज्ञानी पुरुष भेटले तर मोक्षाचा उपाय होईल. देवताही मनुष्यदेहासाठी व्याकुळ असतात. ज्ञानी पुरुषांशी भेट झाल्याने, तार जुळल्याने, अनंत जन्मापर्यंत शत्रू समान झालेला हा देह परम मित्र