Book Title: Death Before During and After Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 26
________________ मृत्यूवेळी, आधी आणि नंतर भूतकाळाला वर्तमानकाळात आणतात. हे भारतीय सुद्धा धन्य आहेत ? भूतकाळाला वर्तमानकाळात आणतात आणि तो प्रयोग आपल्याला दाखवतात. परिणाम कल्पांतचा 15 एकदा कल्पांत केला तर 'कल्प'च्या अंतापर्यंत भटकावे लागेल. एक पूर्ण कल्पाच्या अंतापर्यंत भटकण्याचे झाले हे ! हे 'लिकेज' करु नये प्रश्नकर्ता : नरसिंह मेहतांनी त्यांच्या पत्नीचे निधन झाले त्यावेळी 'भलु थयु भांगी जंजाळ' (भले झाले सुटली जंजाळ) असे बोलले, ते काय म्हटले जाईल ? 4 दादाश्री : परंतु ते खुळ्यासारखे ( आनंदाने वेडे ) बोलून गेले की 'भलु थयु भांगी जंजाळ.' ही गोष्ट तर मनातच ठेवायची होती की 'जंजाळ सुटले.' ते मनातून 'लिकेज' व्हायला नको परंतु हे तर मनातून 'लिकेज' होऊन बाहेर निघाले. मनात ठेवायची गोष्ट जाहीर करणाऱ्या मनुष्याला खुळे म्हटले जाते. ज्ञानी असतात खूप विवेकी आणि 'ज्ञानी' वेडे - खूळे नसतात. ज्ञानी खूप समंजस असतात. मनातून असे वाटते की, 'बरे झाले सुटली जंजाळ' परंतु बाहेर काय म्हणतात ? अरेरे, खूप वाईट झाले. आता मी एकटा काय करणार ? असे देखील म्हणतात. नाटक करतात ! हे जग स्वयं नाटकच आहे, म्हणून मनातून जाणून घ्या 'की, बरे झाले सूटली जंजाळ' परंतु विवेकात राहिले पाहिजे. ‘भले झाले सुटले जंजाळ, सुखाने भजूया श्री गोपाळ' असे नाही बोलायचे, असा अविवेक तर कोणी बाहेरचाही नाही करत. दुश्मन असला, तरीही तो विवेकपूर्वक बसतो. तोंड शोकग्रस्त करुन बसतो. आम्हाला दुःख किंवा असे दुसरे काहीही होत नाही, पण तरीही बाथरुममध्ये जाऊन

Loading...

Page Navigation
1 ... 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62