Book Title: Death Before During and After Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 30
________________ मृत्यूवेळी, आधी आणि नंतर असे नाहीत. म्हणून मग त्यांना समजावले की भाऊ, आपल्या वडिलांचे निधन झाले तर काहीतरी खर्च करा. असे करा, तसे करा, तेव्हा ते आपल्या वडिलांपर्यंत पोहोचेल. तेव्हा लोकंही त्याला रागावून सांगतात की बापासाठी काहीतरी तर कर ना, श्राद्ध कर, काही चांगले कर! तर असे करून दोनशे-चारशे, जे काही खर्च करायला लावतात, धर्माच्या नावावर, इतकेच त्याचे फळ मिळते. बापाच्या नावावर करतो आणि नंतर त्याचे फळ मिळते. जर वडिलांचे नाव घेतले नसते तर या लोकांनी चार आणे सुद्धा खर्च केले नसते. याचा अर्थ अंधश्रद्धेवर हे सगळे चालले आहे, आपल्याला समजले ना? नाही समजले? हे व्रत-उपास करतात ते सगळे आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदात कशा तहेने फायदा होईल, यासाठी व्रत-उपासाची व्यवस्था केली आहे. पूर्वीच्या लोकांनी चांगली व्यवस्था केली आहे. या मूर्ख लोकांनाही त्यामुळे फायदा होईल, म्हणून अष्टमी, एकादशी, पंचमी, असे सर्व प्रबंध केले आणि हे श्राद्धही करतात ना! श्राद्ध, तर खूप चांगल्या हेतूसाठी केले आहे. प्रश्नकर्ता : दादाजी, श्राद्धात कावळ्यांना घास देतात, त्याचे तात्पर्य काय? अज्ञानता म्हटली जाईल ती? दादाश्री : नाही, अज्ञानता नाही. हे एक प्रकारे लोकांनी शिकवले आहे की या प्रकारे श्राद्ध कर्म होतात. आपल्या येथे तर श्राद्ध करण्याचा मोठा इतिहास आहे. त्याचे काय कारण होते? श्राद्ध केव्हापासून सुरु होतात तर भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून ते भाद्रपद कृष्ण अमावस्येपर्यंत श्राद्धपक्ष म्हणतात. सोळा दिवसांचे श्राद्ध. आता ही श्राद्धाची परंपरा लोकांनी का सुरु केली? खूप बुद्धिमान प्रजा आहे. श्राद्ध जे सुरु केले आहे, ती तर सर्व वैज्ञानिक पद्धत आहे. आपल्या इंडियात आजपासून काही वर्षांपूर्वी गावांमध्ये प्रत्येक घरांमध्ये एक खाट टाकलेली असायची. मलेरिया झालेली एक-दोन माणसं खाटेवर झोपलेली असायचीच. कोणत्या महिन्यात? तेव्हा म्हणे, भाद्रपद महिन्यात. आम्ही गावात जात, तर प्रत्येक घराबाहेर एखादी खाट पडलेली असायची आणि त्यावर आजारी माणूस झोपलेला

Loading...

Page Navigation
1 ... 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62