________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
25
उड्या मारल्या असतील, त्याची आम्हाला आपत्ती नाही, पण आता तरी सरळ हो ना, असे सांगतात.
क्षणोक्षणी भाव मरण प्रश्नकर्ता : देहाचा तर मृत्यू म्हटला जातो ना?
दादाश्री : अज्ञानी मनुष्याचे दोन प्रकारे मरण होते. रोज भाव मरण होत असते. क्षणोक्षणी भाव मरण आणि शेवटी देहाचा मृत्यू होतो. परंतु त्याचे मरणे-रडणे रोजचेच. क्षणोक्षणी भाव मरण. म्हणून कृपाळूदेवांनी लिहिले आहे की,
'क्षण-क्षण भयंकर भाव मरणे कां अहो राची रह्यो! (क्षणोक्षणी भयंकर भाव मरण, का अरे प्रसन्न आहेस!') हे सर्वजण जगतात, ते मरण्यासाठी की कशासाठी जगतात?
समाधी मरण म्हणून मृत्यूला सांगावे की, 'तुला लवकर यायचे असेल तर लवकर ये, उशिरा येणार असशील तर उशिरा ये, परंतु 'समाधी मरण' बनून ये!
__ समाधी मरण अर्थात आत्म्याशिवाय दुसरे काहीच आठवत नाही. निजस्वरूप शुद्धात्मा शिवाय दुसऱ्या ठिकाणी चित्त नसतेच. मन-बुद्धिचित्त-अहंकार डगमगत नाही! निरंतर समाधी! देहाला उपाधी असली तरी ती स्पर्शत नाही. देह तर उपाधीवाला आहे की नाही?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : केवळ उपाधीवालाच नाही, तर व्याधीवालाही आहे की नाही? ज्ञानीनां उपाधी शिवतही नाही. व्याधी झाली असेल तर ती सुद्धा शिवत नाही, आणि अज्ञानी तर व्याधी नसेल तरी व्याधीला बोलवतो. समाधी मरण अर्थात 'मी शुद्धात्मा आहे' असे भान असणे, आपल्या