Book Title: Death Before During and After Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 20
________________ मृत्यूवेळी, आधी आणि नंतर तो अतिशय वेदनेत असेल तर त्याचा अंत आणायलाच पाहिजे, त्यात काय चुकीचे आहे? दादाश्री : असा अधिकार कोणालाही नाही. आम्हाला इलाज करण्याचा अधिकार आहे, सेवा करण्याचा अधिकार आहे, परंतु कोणालाही मारण्याचा अधिकार नाहीच. प्रश्नकर्ता : तर त्यात आपले काय भले झाले? दादाश्री : तर मारण्याने काय भले झाले? तुम्ही जर त्या वेदनेत असलेल्या व्यक्तिला मारून टाकले तर तुमचे मनुष्यत्व निघून जाते आणि तो उपाय मानवतेच्या सिद्धांताबाहेरचा आहे, मानवतेच्या विरुद्ध आहे. सोबत, स्मशानापर्यंत ही उशी असते तिचे अभ्रे (कवर) बदलत राहतात, परंतु उशी तर तीच असते. अभ्रे फाटून जातात आणि बदलत राहतात, तसेच हा अभ्रा सुद्धा बदलत राहतो. बाकी हे जग सारे पोलमपोल आहे. तरी पण व्यवहाराने बोललो नाही, तर समोरच्याच्या मनाला दु:ख होते. परंतु स्मशानात सोबत जाऊन तिथे चितेत कोणी उडी घेतली नाही. घरातील सगळे जण परत येतात. सगळे हुशार, समजदार आहेत. त्याची आई असेल, ती सुद्धा रडत-रडत परत येते. प्रश्नकर्ता : मग त्याच्या नावाने छाती बडवतात की मागे काहीच ठेवून गेले नाही, आणि जर दोन लाख ठेवले असतील तर काहीच बोलत नाही. दादाश्री : हो, अस्सं. हे तर मागे काही ठेवून गेला नाही त्याचे रडणे आहे. 'मरुन गेला आणि मारुन गेला' असे सुद्धा आतल्या आत बोलत राहतात. 'काहीच ठेवले नाही आणि आम्हाला मारून गेला,' आता तो काही ठेवून गेला नाही, त्यात त्या बाईचे नशीब कच्चे म्हणून ठेवले

Loading...

Page Navigation
1 ... 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62