Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
निपालमालि-1
भौगपिच्छमानपत्य बलाकपिछ। शिष्योऽजनिष्ट भुवनत्रयवार्तिकीतिः ॥ धारिखचंधुरखिलावनिपालमौलि। मालाशिलीमुखविराजितपादपमः ॥१॥ एवं महाचार्यपरम्पराया स्यात्कारद्रमांकिततत्वदीपः । भद्रः समंताद् गुणतो गणीशः समंतभद्रोऽजनि वादिसिंहः २
अर्थ:--श्रीगृद्धपिच्छ आचायांचे बलाकपिन्छ या नावाचे शिष्य झाले. यांची कीर्ति सर्वत्र पसरली होती. हे निर्दोष चारित्र पाळीत होते. मोठमोठे राजेसुद्धा यांना नमस्कार करीत असत. __ याप्रमाणे मोठमोठ्या आचार्यांच्या परंपरेमध्ये स्याद्वादाची मोहोर ज्यांच्यावर मारली आहे अशा तत्वांना प्रकाशित करणारा अपूर्व दिवा असलेला, आपल्या गुणांनी सर्वांचे कल्याण करणारा, प्रतिवाद्यांना सिंहाप्रमाणे असलेला, मुनिजनांचा अधिपति असा समंतभद्राचार्य उदयास आला.
या अनेक पूज्य आच यांच्या प्रशंसोद्गारांनी व शिलालेख वगैरे साधनांनी भगवान् समंतभद्र हे फार मोठे विद्वान आचार्य होऊन गेले हे सिद्ध होते.
आतां भगवान समंतभद्राचार्यानी जैन समाजास ऋणी करण्याकरितां कोणते ग्रंथ लिहिले याचा उल्लेख करून त्यांच्या अस्तित्वकालाचा ऐतिहासिक दृष्टीने विचार करावयाचा आहे.
१ आचार्यांनी देवागम या नांवाचे स्तोत्र लिहिले आहे. यास आप्तमीमांसा असेंही नाव आहे. हे जिनेश्वरस्तुतिपर आहे. यांत सवज्ञ कोण होऊ शकतो ? या विषयाचे प्रतिपादन अत्युत्तम केलें आहे. सांख्य नैयायिक बौद्ध यांच्या तत्वाचे खंडन यांत फार उत्तम रीतीने केले आहे. हे स्तोत्र फार महत्वाचे आहे. या स्तोत्रावर भट्टाकलंक आचार्यानीं ' अष्टशती' नांवाची टीका लिहिली आहे. अष्टशतीवर
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org