________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
आरा असतो. आणि आपल्या इथे तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असे आरे बदलत राहतात.
प्रश्नकर्ता : आपल्या इथे तीर्थंकर केव्हा असतात? दादाश्री : इथे तिसऱ्या-चौथा आऱ्यात तीर्थंकर होतात!
प्रश्नकर्ता : आणि तीर्थंकर हे आपल्या इथे हिन्दुस्तानातच होतात, अन्य कोठेही होत नाही?
दादाश्री : ह्याच भूमीवर! या हिन्दुस्तानाच्याच भूमीवर! ह्याच भूमिवर तीर्थंकर होतात, इतर कुठल्याही जागी होतच नाही. चक्रवती सुद्धा ह्याच भूमीवर होतात, अर्धचक्रवती सुद्धा ह्याच भूमीवर होतात. त्रेसष्ठ शलाका पुरुष सुद्धा सर्व इथेच होतात.
प्रश्नकर्ता : ह्या भूमीची काही महत्वता असेल का? दादाश्री : ही भूमि खूप उच्च मानली जाते!
प्रश्नकर्ता : सीमंधर स्वामींचेच पूजन कशासाठी? अन्य वर्तमान तीर्थंकरांचे पूजन का नाही?
दादाश्री : सगळ्या तीर्थंकरांचे होऊ शकते, पण सीमंधर स्वामींचा हिन्दुस्तानासोबत हिशोब आहे, त्यांची भावना आहे. वीस तीर्थंकरांमधन सीमंधर स्वामींचीच विशेष रुपाने भजना केली पाहिजे, कारण की आपल्या भरतक्षेत्राच्या सर्वात जवळ तेच आहेत आणि भरतक्षेत्राबरोबर त्यांचे ऋणानुबंध आहे.
__वर्तमानात वीस तीर्थंकर आहेत, त्यातील फक्त तीर्थंकर श्री सीमंधर स्वामींचेच भरतक्षेत्राबरोबर ऋणानुबंधाचा हिशोब आहे. तीर्थंकरांचा सुद्धा हिशोब असतो. आणि सीमंधर स्वामी तर आज साक्षात प्रकट भगवंत आहेत.