________________
12
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
आणि तेथील मनुष्यांची लक्षणे जर पाचव्या आऱ्याच्या लायक झाली असतील ते इथे पाचव्या आयत (जन्माला) येतात, असा क्षेत्राचा स्वभाव आहे. कुणाला आणावे-पाठवावे लागत नाही. क्षेत्राच्या स्वभावानूसार हे सर्व लोक तीर्थंकरांजवळ पोहोचणार. म्हणून जे सीमंधर स्वामींचे नित्य स्मरण करतात, त्यांची भक्ति-आराधना करतात, असे लोक नंतर त्यांचे दर्शन करतील आणि त्यांच्याजवळ बसतील आणि मोक्ष प्राप्त करतील.
आम्ही ज्यांना ज्ञान देतो, ते एक-दोन अवतारी होतील. नंतर त्यांना सीमंधर स्वामींजवळच जायचे आहे. त्यांचे दर्शन करण्याचे, फक्त तीर्थंकरांचे दर्शन करणेच मात्र बाकी राहिले. बस, दर्शन होताच मोक्ष. म्हणजे बाकी सर्व दर्शन झाले. हे अंतिम दर्शन घेतले की जे ह्या दादाजींपेक्षाही पुढचे दर्शन आहे. हे दर्शन घेतले म्हणजे लगेच मोक्ष!
प्रश्नकर्ता : जितके लोक सीमंधर स्वामींचे दर्शन करतात, ते सर्व नंतर मोक्षाला जातात ना?
दादाश्री : फक्त असे दर्शन केल्याने मोक्षाला जातील असे काही नसते, त्यांची कृपा प्राप्त झाली पाहिजे. तिथे हृदय निर्मळ झाल्यानंतर स्वामींची कृपा उतरत जाते. हे तर त्यांचे ऐकण्यासाठी येतात आणि कानाला खूप मधुर वाटते, पण मग ऐकल्यानंतर पुन्हा जसेच्या तसेच. त्यांना तर फक्त चटणीच आवडत असते. जेवणाचे पूर्ण ताट समोर असेल तरी, फक्त एका चटणीसाठीच ताट धरुन बसून राहिला असेल तर मोक्ष होत नाही.
त्यांच्यासाठी तर समोरुन येते महाविदेह क्षेत्र ज्याला इथे शुद्धत्म्याचे लक्ष (भान) झाले असेल, तो इथे भरत क्षेत्रात राहूच शकत नाही. ज्याला आत्म्याचे लक्ष बसलेले असेल, तो महाविदेह क्षेत्रातच जाऊन पोहोचतो, असा नियम आहे ! इथे दुषमकाळात तो राहूच शकत नाही. ज्याला शुद्धात्म्याचे लक्ष प्राप्त झाले, तो महाविदेह