________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
13
क्षेत्रात एक किंवा दोन जन्म घेऊन, तीर्थंकरांचे दर्शन करुन मोक्षात निघून जातो. असा हा सरळ-सोपा मार्ग आहे!
त्यांचे अनुसंधान 'दादा भगवान' मार्फत सीमंधर स्वामींना 'फोन' करायचा असेल तर त्यासाठी फोनचे माध्यम पाहिजे तेव्हा फोन पोहचेल. तर हे माध्यम आहे 'दादा भगवान' (सीमंधर स्वामी सोबत अनुसंधान करण्यासाठी) समजा, महावीर भगवान आज दिल्लीत असतील आणि इथून त्यांचे नाव घेतले तर त्यांच्यापर्यंत पोहोचेल की नाही? त्याचप्रमाणे हे सुद्धा पोहोचून जाते! हा फोन जरा अर्धा मिनिट उशीरा पोहोचतो, पण पोहोचतो.
सीमंधर स्वामी स्वत:हजर आहेत, पण आपल्या पृथ्वीतलवार नाही, दुसऱ्या पृथ्वीवर आहेत. त्यांच्यासोबत आमचे (दादाश्रींचे) तार वैगेरे सर्व जोडलेले आहेत. म्हणजे संपूर्ण जगाचे कल्याण व्हायलाच पाहिजे. आम्ही तर निमित्त आहोत, ‘दादा भगवान' श्रु (द्वारे) तुम्हाला दर्शन करवतो, ते तिथपर्यंत पोहोचून जाते. म्हणूनच आम्ही एक जन्म सांगितला आहे ना! इथून मग तिथेच जायचे आहे आणि सीमंधर स्वामींजवळच बसायचे आहे. त्या नंतर मुक्ती होईल. म्हणून आजपासूनच ओळख करुन देतो आणि 'दादा भगवान' श्रु नमस्कार करवून घेतो.
सीमंधर स्वामींसोबत आमची इतकी चांगली ओळख आहे की आमच्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही दर्शन केले तर ते थेट त्यांचापर्यंत पोहोचते.
.... ते 'दादा भगवान' द्वारे अवश्य पोहोचतेच
प्रश्नकर्ता : आम्ही भक्ति करतो ती सीमंधर स्वामींपर्यंत कशी पोहोचते? कारण ते तर महाविदेह क्षेत्रात आहेत आणि आपण तर इथे आहोत.
दादाश्री : कलक्त्यामध्ये असतील तर पहोचेल की नाही पोहोचेल?