________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
29
दादाश्री : त्यावेळी असे आचार राहणार नाही. आता जे तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करता, त्याचे फळ तेव्हा मिळेल. आणि आताचा हा जो कचरा माल आहे, तो तुम्ही मला विचारल्या शिवाय भरला होता, तो आता निघत आहे.
प्रश्नकर्ता : दादाजी, सीमंधर स्वामींचे स्मरण केल्याने, सीमंधर स्वामींजवळ जाऊ शकु असे निश्चित होऊ शकते का?
दादाश्री : जायचे आहे, हे तर नक्कीच आहे. यात दुसरे काही नाही, पण सदैव स्मरण राहिल्याने आत दूसरा नवीन काही घुसत नाही. सदैव दादांचे स्मरण राहिले किंवा तीर्थंकरांचे स्मरण राहिले तर मग आत माया प्रवेश करत नाही! आता इथे माया येऊ शकत नाही.
जबाबदारी कोणाची घेतली? आमचा सीमंधर स्वामींसोबत संबंध आहे. आम्ही सर्व महात्म्यांच्या मोक्षची जबाबदारी घेतली आहे. जो आमची आज्ञा पाळेल, त्याची जबाबदारी आम्ही घेतो.
हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर एक अवतारी होऊन सीमंधर स्वामींजवळ जाईल आणि तिथून मोक्ष प्राप्त होईल, कोणाचे दोन अवतार (जन्म) पण होतील पण चार अवतारांपेक्षा जास्त तर नाहीच होणार, जर आमची आज्ञा पाळली तर. येथेच मोक्ष होईल. 'येथे तुम्हाला एक जरी चिंता झाली तरी दावा दाखल करा' असे आम्ही म्हणतो. हे तर वीतराग विज्ञान आहे. चोवीस तीर्थंकरांचे एकत्रित विज्ञान आहे.
फक्त सीमंधर स्वामीच आमचे एकमेव वरिष्ठ प्रश्नकर्ता : आमचे रक्षणकर्ता तर तुम्ही आहात पण तुमचे वरिष्ठ कोण आहे ? तुमच्याजवळ जो पण येईल त्याच्यासोबत तर तुम्हाला कायदेशीरच चालावे लागते ना?
दादाश्री : खूपच कायदेशीर! आणि आमचे वरिष्ठ तर हे जे बसले