Book Title: The Current Living Tirthankara Shree Simandhar Swami
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 24
________________ वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी याचे नाव पाचवा आरा. (ही पाचव्या आऱ्याची लक्षणे) आणि चौथ्या आयात तर जसे मनात असते तसेच वाणीत बोलतात आणि तसेच करतात. चौथ्या आऱ्यात जर एखादा मनुष्य म्हणाला की मला पूर्ण गावाला पेटवून देण्याचे विचार येत आहेत, तेव्हा आपण समजून जावे की, हे कधीतरी रुपकात येणारच आहे. आणि येथे आज जर कोणी म्हणाले की मी तुमचे घर जाळून खाक करेल, तर आपण समजावे की अजुन तर फक्त मनातच आहे पण हे करण्यासाठी तू मला केव्हा भेटशील काय माहित? तोंडाने बोलला असेल तरी सुद्धा त्यात काही बरकत नसते. 'मी तुम्हाला मारुन टाकेल' असे म्हणतो पण ते बोलण्यात काही तथ्य नसते. मन-वचनकायेची एकता राहिलेली नाही. मग बोलल्याप्रमाणे कार्य कसे होऊ शकेल? कार्य होणारच नाही ना! । कोणत्या पात्रतेने जाऊ शकतो 'तिथे'? प्रश्नकर्ता : 'तिथे' महाविदेह क्षेत्रात जायचे असेल तर कोणत्या प्रकारे मनुष्य जाऊ शकेल? दादाश्री : तो 'तिथल्या सारखा झाला असेल' तेव्हा. पाचव्या आयात जर चौथ्या आयसारखे गुण मनुष्याचे झाले तर तिथे जाऊ शकतो. जर कोणी शिवी दिली तरीही मनात शिवी देणाऱ्यासाठी वाईट भाव होत नाही, या पाचव्या आयचे दुर्गुण निघून गेले की तिथे जाऊ शकतो. प्रश्नकर्ता : साधारणपणे इथून सरळ मोक्षाला जाता येत नाही. आधी महाविदेह क्षेत्रात जायचे मग तिथून मोक्षाला जायचे, असे कशामुळे होते? दादाश्री : क्षेत्राचा स्वभाव असा आहे की, मनुष्यांची लक्षणे ज्या 'आयच्या' लायक झाली असतील, तिथे ते खेचले जातात. जसे आपल्या इथे चौथ्या आऱ्याच्या लायक झाले असतील, जरी त्यांना हे ज्ञान मिळाले नसेल असे लोकही असतील, तर ते तिथे चौथ्या आऱ्यात खेचले जातात.

Loading...

Page Navigation
1 ... 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50