________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
हवे तेवढे दूसरे देरासर (मंदीर) आहेतच. आणि त्यांची गरजही आहे. आपण त्यास नाही म्हणत नाही. कारण की ही तर मूर्तीपूजा आहे, आणि भूतकाळातील तीर्थंकरांची आहे ना!
__ ही ईच्छा आहे 'आमची' जगातील मतभेद कमी करायचे आहेत. जेव्हा मतभेद दूर होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने ही गोष्ट समजता येईल. हे मतभेद तर एवढे सारे केलेले आहेत की ही शिवची एकादशी आणि ही वैष्णवची एकादशी. एकादश्या सुद्धा वेगवेगळ्या करुन ठेवल्या. म्हणून मी मंत्रांना एकत्र करुन टाकले आणि मंदिर वेगळे-वेगळे ठेवले. कारण की ही एक प्रकारची बिलिफ (मान्यता) आहे. पण हे जे मंत्र आहेत ते एकत्र राहू द्या. कारण मन सदैव शांत झाले पाहिजे ना? या लोकांनी हे सगळे मंत्र वाटून टाकले होते. मी या सगळ्यांना एकत्रित करुन अशी प्रतिष्ठा करेल की लोकांचे सर्व मतभेद हळूहळू मिटतील. ही ईच्छा आहे आमची, दूसरी कोणतीच ईच्छा नाही.
हिन्दुस्तानाची ही अशी स्थिती राहयला नको. जैन या स्थितीत रहायला नको. सीमंधर स्वामींचे मंदिर हे मूर्तीचे मंदिर नाही! हे तर अमूर्तचे मंदिर आहे!
आरती सीमंधर स्वामींची सध्या वर्तमानात जे भगवंत बह्मांडात हजर आहे, त्यांची आरती दादा भगवान श्रु (माध्यम द्वारे) हे सर्वजण करतात, आणि मी ती आरती त्यांच्यापर्यंत पोहचवतो. मी सुद्धा त्यांची आरती करतो. दीड लाख वर्षांपासून भगवंत हजर आहेत. त्यांच्यापर्यंत मी पोहोचवतो.
आरतीत सर्व देवी-देवता हजर असतात. ज्ञानी पुरुषांची आरती थेट सीमंधर स्वामींपर्यंत पोहचते. सर्व देवी-देवता काय म्हणतात? की जिथे परमहंसांची सभा असते तिथे आम्ही हजर राहतो. आपली ही आरती कोणत्याही मंदिरात म्हणा तिथे भगवंतांना हजर रहावे लागेल.