________________
वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
प्रश्नकर्ता : पण इथे अमूर्त आहे आणि तिथे मूर्तीत अमूर्त नाही, असे मानतात ना ?
21
दादाश्री : तिथे अमूर्त नाही, पण तिथे मूर्तीत त्यांची प्राणपतिष्ठा केलेली असते, ते तर प्रतिष्ठेप्रमाणे बळ ! यांची तर गोष्टच निराळी आहे ना? प्रत्यक्ष-प्रकट भगवंतांची गोष्टच निराळी ना! प्रकट नसते तेव्हा काहीचे काहीच होऊन जाते.
प्रश्नकर्ता: आणि प्रकट तर नसतातच, खूप काळापर्यंत.
दादाश्री : आणि ते नसतील तर भूतकाळातील तीर्थंकर, आपले चोवीस तीर्थंकर तर आहेतच ना !
वर्तमान तीर्थंकरच हितकारी
प्रश्नकर्ता: दादाजी, हे मंदिर वैगेरे जे बांधत आहे, त्यात वास्तवात आत्म्याचाच भाव करायचा आहे ना ? मग मंदिर आणि इतर सगळ्या गोष्टींचा काय काम आहे ? खरे तर आपल्याला आत्म्याचाच मार्ग शोधायचा आहे ना ?
दादाश्री : मंदिर तर विशेष करुन बांधले गेले पाहिजे. जे गेले त्यांचे मंदिर बांधणे याला काय अर्थ ? सीमंधर स्वामी हजर आहेत, म्हणून त्यांचे दर्शन केल्याने कल्याण होईल. आणि ते प्रत्यक्ष आहेत, म्हणून कल्याण होईल. असे काही घडले तर लोकांचे कल्याण होईल, निमित्त पाहिजे. म्हणजे सीमंधर स्वामींचा संकेत अवश्य फळ देणारे आहे. ज्या लोकांनी ज्ञान घेतले नसेल पण मंदिरात जाऊन फक्त सीमंधर स्वामींचे दर्शन जरी घेतले तरी देखील त्यांना लाभ होईल, म्हणून हे मंदिर उभारण्याचे कार्य होत आहे, नाहीतर आम्ही कशासाठी उभारले असते असे मंदिर ? विनाहेतूची गोष्ट आपल्याला शोभत नाही. आणि हे तर जीवंत तीर्थंकर आहेत, म्हणूनच त्यांची गोष्ट करीत आहोत. इतर भूतकाळातील तीर्थंकरांची गोष्ट करण्यात काही अर्थच नाही. आपल्या येथे तीर्थंकरांचे