Book Title: Sangharsh Tala
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 12
________________ संघर्ष टाळा आपल्या समज (मर्जी)प्रमाणे कोणी नाही ना चालत? आणि येथे व्यवहारात स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालणार! कुठलाही कायदा नाही? रस्त्यावर तर कधीच अडचण येत नाही, ते किती छान वाहतुकीची व्यवस्था केलेली आहे? आता हा जो कायदा तुम्ही नीट समजून चाललात, तर मग कधी अडचण येणार नाही. म्हणजे हे कायदे समजण्यात चुक आहे. कायदा समजविणारा समजूतदार असला पाहिजे. ____ट्राफिकचे (वाहतूकीचे) नियम पाळण्याचा तुम्ही निश्चय केलात, तर त्यामुळे किती छान नियम पाळले जातात! त्यात का अहंकार जागृत होत नाही 'ते काहीही सांगू देत, पण मी तर असेच करणार.' कारण कि तो ट्राफिकच्या नियमांना आपल्या बुद्धिनुसार बरोबर समजतो, स्थूल आहे म्हणून, हात कापला जाईल, लगेच मरेन. असे हे संघर्ष करून ह्यात मरुन जाईन याची जाणीव नव्हती. ह्यात बुद्धि पोहचू शकत नाही. ही सूक्ष्म वस्तु आहे. ह्यामुळे सारे नुकसान सूक्ष्म प्रकारेच होतात. प्रथम प्रकाशिले हे सूत्र ! एका व्यक्तिला एक्कावन साली हे एक सूत्र दिले होते. मला तो हा संसार पार करण्याचा सल्ला विचारीत होता. मी त्याला 'संघर्ष टाळ' असे म्हटले होते. आणि अशा रीतीने त्याला समज दिली होती. हे तर झाले असे कि मी शास्त्राचे पुस्तक वाचत होतो, तेव्हा तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला कि 'दादाजी, मला काही तरी ज्ञान द्याच.' तो माझ्याकडे नोकरी करत होता. तेव्हा मी त्याला म्हटले 'तुला काय ज्ञान द्यायचे? तू तर सगळया जगाशी भांडून येतोस. मारामारी करून येतोस' रेल्वेतही तू मारामारी केलीस, तू पैसाचे पाणी करतो आणि रेल्वेला जे कायदेशीर भरायचे आहे, ते पैसे तू भरत नाहीस. आणि वरुन भांडण करतोस, हे सारे मला माहित आहे. जेव्हा त्याला सांगितले कि 'तुला शिकवून काय करायचे? तू तर सगळयांशी भांडतोस!' तेव्हा तो म्हणाला,

Loading...

Page Navigation
1 ... 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38