Book Title: Sangharsh Tala
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 30
________________ २१ संघर्ष टाळा करायला हवे. नाहीतर खूप जबाबदारी आहे. या ज्ञानानी मोक्षाला तर जाल, परंतु घर्षणाने मोक्षाला जातानां खूप अडचणी येतात आणि उशीर होतो. ह्या भिंतीसाठी उल्टे विचार आले तर हरकत नाही, कारण ते एकपक्षी नुकसान आहे. परंतु जिवंत लोकांसाठी एक पण वाकडा विचार आला तर जबाबदारी आहे. दोन्हीपक्षी नुकसान होणार. परंतु आपण त्यानंतर प्रतिक्रमण केले तर सर्वच दोष नाहीसे होतात. म्हणून जिथे जिथे घर्षण होत आहे तिथे नंतर प्रतिक्रमण करा म्हणजे घर्षण संपून जाईल. समाधान सम्यक् ज्ञानानेच प्रश्नकर्ता : दादा, ही अहंकाराची गोष्ट घरात बऱ्याच वेळा लागू पडते, संस्थेत लागू पडते, दादाचे काम करीत असताना ही अहंकारामुळे संघर्ष होत असतो तिथे ही लागू पडते. तिथे सुद्धा समाधान पाहिजे ना? दादाश्री : हो समाधान पाहिजे ना ! तो आपल्या इथे ज्ञान घेतलेला समाधान करेल, पण ज्ञान नाही तिथे काय समाधान घेईल? तेथे मग वेगळा होत जाईल, त्याच्या बरोबर मन वेगळे होत जाते. आपल्या इथे वेगळे नाही पडणार !!! प्रश्नकर्ता : पण दादा, संघर्ष करायला नको ना ? दादाश्री : संघर्षण, हा तर स्वभाव आहे. असा माल (कर्म) भरून आणला आहे म्हणून असे होते. जर असा माल आपला नसता तर असे झाले नसते. त्यामुळे आपण समजून घ्यावे कि भाऊची तशी सवयच आहे. मग आपल्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. कारण कि, सवय, सवईवाल्याची (पूर्वसंचित संस्कारवाले जीव), आणि 'आपण' आपले (शुद्धात्मा) ! आणि मग त्याचा निकाल होऊन जातो. तुम्ही अडकून राहिलात तरच भानगड! बाकी, संघर्ष होणारच. संघर्ष होणार नाही असे घडतच नाही. त्या संघर्षामुळे आपण एकमेकांपासून वेगळे होणार नाही ह्याची दक्षता घ्यायची. संघर्ष तर अवश्य होतोच. तो तर पति-पत्नीमध्ये पण होतो, पण

Loading...

Page Navigation
1 ... 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38