________________
२०
संघर्ष टाळा दादाश्री : पूर्वीचे घर्षणच घर्षण करवित आहे। जड किंवा चेतन ह्यांचा त्यात प्रश्नच नाही. आत्मा ह्यात हात घालत च नाही. हे सारे घर्षण पुद्गलच (शरीरात असलेला आत्मा शिवायचा भाग जे पूरण होत असतो आणि गलन होत असतो जसे कि मन-बुद्धि-चित्त-अहंकार, कषाय इत्यादि सर्व) करवित आहे. पण जे पूर्वीचे घर्षण आहे ते परत घर्षण करवित आहे. ज्यांचे पूर्वीचे घर्षण संपून गेले त्यांचे पुन्हा घर्षण होत नाही. नाहीतर घर्षणामुळे पुन्हा घर्षण, आणि त्याच्यावर पुन्हा घर्षण असे वाढतच जाईल.
पुद्गल म्हणजे काय ते पूर्णतः जड नाही ते मिश्रचेतन आहे. ह्याला विभाविक पुद्गल म्हटले आहे. विभाविक म्हणजे विशेषभावाने परिणाम पावलेले पुद्गल, ते सारे करवित आहे! जे शुद्ध पुद्गल आहे, ते पुद्गल असे तसे नाही करत. हे पुद्गल तर मिश्रचेतन झालेले आहे. आत्माचा विशेषभाव आणि त्याचा (पुद्गलचा) विशेषभाव, दोन्ही एकत्र होऊन तिसरे रुप झाले, प्रकृतिस्वरूप झाले. ते सारे घर्षण करविते!
प्रश्नकर्ता : घर्षण नाही होत, हा खरा अहिंसकभाव उत्पन्न झाला असे म्हणता येईल?
दादाश्री : नाही तसे काही नाही! पण हे दादांकडून समजले कि, ह्या भिंती बरोबर घर्षण केल्याने एवढा फायदा (!), तर परमेश्वर बरोबर घर्षण करण्यात केवढा फायदा? एवढे जोखीम कळल्याने च आपले परिवर्तन होत राहते.
अहिंसा तर पूर्णपणे समजेल असे नाही आणि पूर्णपणे समजणे खूप कठीण आहे. त्याच्यापेक्षा एवढे जर पकडले असेल कि 'घर्षणात कधीच पडू नये.' त्यामुळे मग काय होते कि शक्ति अनामत रहाते आणि दिवसें दिवस शक्ति वाढत च जाते. मग घर्षणाने होणारे नुकसान होणार नाही! कधी घर्षण होवून गेले तर घर्षणानंतर आपण प्रतिक्रमण केले तर ते नाहीसे होते. म्हणजे इतके समजायला हवे कि ह्या पुढे घर्षण झाले तर प्रतिक्रमण