Book Title: Sangharsh Tala
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 19
________________ १० संघर्ष टाळा दादाश्री : तर मग कोणी सावध राहिले पाहिजे ? त्यात भिंतीला काय? ह्यात दोष कोणाचा? ज्याला लागले त्याचा दोष. अर्थात् भिंतीसारखे जग आहे. भिंतीशी टक्कर झाली तर भिंतीबरोबर मतभेद होऊ शकतील का? कधीतरी भिंती किंवा दरवाजा वर तुम्ही आपटलात तर त्यावेळेस दरवाज्याशी किंवा भिंतीशी मतभेद होईल का? प्रश्नकर्ता : तो दरवाजा तर निर्जीव आहे, ना? दादाश्री : म्हणजे ज्याच्यात जीव आहे तेच माझ्याशी आपटतात असे तुम्हाला वाटते, ह्या जगात जे आपटतात त्या सर्व वस्तु निर्जीव च असतात. जे आपटतात ते जिवंत नसतात, सजीवास टक्कर होत नाही, निर्जीव वस्तु आपटते. म्हणून तुम्ही भिंतीसारखेच समजून घ्यायचे म्हणजे डखा (दखल) नाही करायचा. आणि मग थोड्या वेळेनंतर म्हणायचे 'चला, चहा पियुया.' आता एक मुलगा दगड मारतो आणि रक्त निघते. तेव्हा त्या मुलाला काय कराल? रागवाल. परंतु तुम्ही जात असताना डोंगरावरुन एक दगड पडला तो लागला आणि रक्त निघाले तर तुम्ही काय कराल? रागवाल? नाही. तर ह्याचे काय कारण? तो दगड तर डोंगरावरुन पडला आहे म्हणून ! त्या मुलाला तर पश्चाताप ही होत असेल नंतर, कि हे माझ्या हाताने असे कसे झाले? म्हणून ह्या जगाला समजा. माझ्याकडे आलात तर चिंता होणार नाही असे करून देईन. आणि संसारात चांगल्या रीतीने रहा आणि पत्नी बरोबर अगदी आरामात फिरायला जा! मुला-मुलींची लग्न अगदी निवांतपणे करा. तेव्हा मग तुमची पत्नी खुश होऊन जाईल. ती म्हणेल किती शहाणे बनवून टाकले माझ्या नवऱ्याला. आता पत्नीचे, शेजारच्या बाई बरोबर भांडण झाले असेल आणि ती

Loading...

Page Navigation
1 ... 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38