________________
संघर्ष टाळा प्रकाराची माणसे आहेत. त्या सर्व लोकांशी तू संघर्षात पडू नकोस. अशा रीतीने तू आता मार्ग काढ.'
हे सारे मी त्याला १९५१ साली समजाविले होते. पण तो आता सुद्धा त्यात कमी पडत नाही. त्यानंतर त्याने कधीच कोणाशी वादविवाद केला नाही. हे शेठजी त्याचे काका लागतात. त्यांच्या हे लक्षात आले होते कि, हा आता कोणाशी संघर्ष करीत नाही. म्हणून ते शेठजी जाणून-बुजून त्याची कळ काढायचे. ते एखाद्या बाजूने काही कोंडी करायचे तर दुसऱ्या बाजूने हा मुकाटेने निघून जायचा. दुसऱ्या बाजूने कोंड्या केल्या कि फिरुन दुसऱ्या बाजूने निघून जायचा. संघर्ष तो टाळत होता १९५१ नंतर त्याने कोणाशीच संघर्ष केला नाही.
व्यवहारात, टाळा संघर्ष असा जेव्हा आपण गाडीतून उतरतो कि लगेच हमालाला इकडे ये! इकडे ये! असे ओरडतो. तीन-चार हमाल धावत येतात. आपण म्हणतो. 'चल हे सामान उचल'. त्याने सामान उचलून घेतल्यानंतर, स्टेशनातून बाहेर आल्याने वर पैसासाठी आपण कटकट करतो. 'मास्तरला बोलवू का? असे करू का? इतके जास्त पैसे घेतात का? तू असे करतो आणि तसे करतो.' अरे वेड्या येथे असे करून नाही चालणार. त्याच्या बरोबर वादविवाद करू नकोस. तो पंचवीस रुपये म्हणत असेल तर आपण त्याला समजावून सांगायचे, 'भाऊ, हे खरोखर दहा रुपयाचे काम आहे. परंतु मी वीस रुपये देत आहे. आपल्याला माहित आहे कि आपण फसवले जात आहोत, तरी थोडे फार कमी-जास्त पैसे देऊन निकाल करावा तेथे वादविवाद करून नये. नाहीतर तो खूप वैतागून जाईल. आधीच तो घरुन चिडून आलेला असणार आणि स्टेशनवर आपण त्याच्याशी कटकट केली तर तो वेड्या सांड सारखा आहे, लागलीच चाकू मारेल तुम्हाला. तेहतीस टक्कयाने माणूस झाला, बतीस टक्कयाने सांड होतो!