________________
भावना सुधारे जन्मोजन्म
दादाश्री : तो स्वता:च आता अहंकार आहे, म्हणून ते नाही दुभावायचे. तो स्वता:च आहे सर्व, ज्यात तो करतो ते मीच आहे हे. म्हणून दुभावायचे नाही. तुम्ही घरात ही कोणावर रागवायचे नाही. कोणाचा अहंकार नाही दुभावणार तसे ठेवावे. अहंकार कोणाचाही दुभावला नाही पाहिजे. अहंकार दुभावला तर तो माणूस वेगळा पडून जाईल मग पुन्हा तो आपल्याला भेटणार नाही. आपण असे कोणाला नाही म्हणायला पाहिजे. 'तू बेकार आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस.' असे पाडून बोलायला नाही पाहिजे. हो, रागवायचे खरं, रागवण्यात हरकत नाही, पण कसे ही करुन त्याचा अहंकार नाही दुभावला पाहिजे. डोक्यावर लागले तर त्याची हरकत नाही, पण त्याच्या अहंकारावर नाही लागले पाहिजे. कोणाचा अहंकार भग्न नाही केला पाहिजे.
आणि मजूर असला तरी त्याचाही तिरस्कार नाही केला पाहिजे. तिरस्काराने त्याचा अहंकार दुभावतो. आपल्याला त्याचे काम नसेल तर आपण त्याला म्हणावे, 'भाऊ, मला तुझे काम नाही' आणि त्याचा जर अहंकार दुभावत नसेल तर पाच रूपये देऊनही त्याला मोकळे करावे. पैसे तर मिळून येतील पण त्याचा अहम् नाही दुभावला पाहिजे. नाहीतर तो वैर बांधेल, जबरदस्त वैर बांधेल ! आपले श्रेय होऊदेणार नाही, मध्ये येईल.
ही तर फार खोलवरची गोष्ट आहे. असे असूनही कोणाचा अहंकार तुमच्याकडून दुभावला गेला तर येथे आमच्याजवळ(ह्या कलम प्रमाणे) शक्तिची मागणी करावी. म्हणजे जे झाले, त्यापासून स्वता:चा अभिप्राय वेगळा ठेवतो, म्हणून त्याची जबाबदारी जास्त नाही. कारण की आता त्याचा 'ओपिनियन'(अभिप्राय) फिरुन गेला आहे. अहंकार दुभावण्याचा जो 'ओपिनियन' होता, तो ही मागणी करण्याने वेगळा होऊन गेला.
प्रश्नकर्ता : 'ओपिनियन'हून तो वेगळा होऊन गेला म्हणजे काय? दादाश्री : ‘दादा भगवान' तर समजून गेले ना, की ह्याला आता