________________
भावना सुधारे जन्मोजन्म
ठेवत जा आणि हे नव कलमे भावीत जा, तर येणारा भव होऊन गेला उत्तम !
प्रश्नकर्ता : हे 'ज्ञान' नसेल घेतले ते लोक पण अशा रीतीने आचार परिवर्तन करु शकतात ना?
दादाश्री : होय, सर्व परिवर्तन करु शकतात. वाटेल त्याला बोलायची सुट आहे.
प्रश्नकर्ता : काही वाईट झाले तर तद्-नंतर ते धुऊन टाकण्यासाठी नव कलमे हे जबरदस्त उपाय आहे.
दादाश्री : मोठा पुरुषार्थ आहे हे तर. मोठ्यातले मोठे विज्ञान आम्ही उघड केले आहे हे. पण आता लोकांना समजले पाहिजे ना ! म्हणून कर्तव्यबंध केले की एवढे तुम्हाला करायचे. जरी समजत नसेल तरी हे (नव कलमांचा औषध) पिऊन टाकना !
प्रश्नकर्ता : आतील रोग खलास होतील.
दादाश्री : होय खलास होऊन जातील. 'दादा' म्हणाले की 'वाचा' म्हणजे वाचायचे फक्त. खूप झाले ! हे तर पचवण्यासाठी नाही. हे तर पुडी विरघळून पी आणि मग ऐटीत फिरण्या सारखे आहे !
प्रश्नकर्ता : ही गोष्ट खरी आहे की भाव केल्याने पात्रता वाढते?
दादाश्री : भाव हाच खरा पुरुषार्थ आहे. हे दुसरे सर्व ठावठिकाणा बिगरच्या गोष्टी आहेत. कर्तापद हे बंधनपद आहे आणि हे भाव तर सोडवणारे पद आहे. 'असे करा, तसे करा, अमके करा' त्याने तर लोकं बांधली गेली ना !
भावना फळेल येत्या जन्मामध्ये प्रश्नकर्ता : तर जेव्हा असा प्रसंग बनला की आपल्याने कोणाच्या