________________
३८
भावना सुधारे जन्मोजन्म
दादाश्री : तुम्ही नव कलमे बोलणे हे वेगळे आहे आणि प्रतिक्रमण करणे हे वेगळे आहे, जे दोष होतील त्याचे प्रतिक्रमण तर रोजच करायचे.
हे तर अनेक अवतारां पासून लोकां बरोबर जी खिटपीट झाली असेल ते सर्व ऋणानुबंध ह्या नव कलमे बोलण्याने सुटून जातील. हे प्रतिक्रमण आहे, मोठ्यात मोठे प्रतिक्रमण आहे. ह्या नव कलमां मध्ये सर्व पूर्ण जगाचे प्रतिक्रमण येऊन जाते. चांगल्या रीतीने करा. आम्ही तुम्हाला दाखवून देतो, मग आम्ही आमच्या देशात (मोक्षात) निघून जाणार ना !
वर्तली नव कलमे दादांना जीवनभर !
असे आहे की ह्या काळाच्या हिशोबाने लोकांना शक्ति नाही. ही जेवढी शक्ति आहे तेवढेच दिले आहे. एवढी भावना भावेल, त्यांस पुढच्या जन्मात मनुष्यपणा जाणार नाही याची गॅरन्टी देतो. नाही तर आज ऐंशी टक्का मनुष्यपणा नाही राहणार असे होऊन गेले आहे.
आपली ही नव कलमे आहेत ना ह्यात मोठ्यात मोठ्या भावना आहेत. सर्व संपूर्ण सार येऊन जातो. ही नव कलमे आम्ही संपूर्ण जीवनभर पाळत आलो, तर ही पूंजी आहे आमची. अर्थात् हा माझा रोजचा माल, तो मी बाहेर ठेवला शेवटी, लोकांचे कल्याण होवो त्यासाठी. निरंतर कितीतरी वर्षांपासून, चाळीस चाळीस वर्षांपासून ही नव कलमे दररोज आतमध्ये चालतच आहेत. ते पब्लिकसाठी मी जाहिर केले.
प्रश्नकर्ता : आज तर आम्ही 'हे दादा भगवान मला शक्ति द्या' असे करुन बोलतो, तर ही नव कलमे आपण कोणास म्हणत होता?
दादाश्री : हे 'दादा भगवान' नाही असेल, तर दुसरे नांव असेल पण नांव असेलच. त्यांनाच उद्देशून म्हणत होतो. मग ते शुद्धात्मा म्हणा की जे काही म्हणा ते. हे त्यांनाच उद्देशून म्हणत होतो.