________________
३६
भावना सुधारे जन्मोजन्म
सांगितले आहे त्याच प्रमाणे तर आमची भावना आहे, इच्छा आहे, सर्व आहे अभिप्राय ही आहे.
दादाश्री : पूर्वी करत होतात त्या प्रमाणे तसे वाटते खरे पण ते तसे नसते. त्या बाजूला वळण आहे ही गोष्ट नक्की. पण ते वळण नीट ह्या प्रकारे असले पाहिजे. डिझाईनपूर्वक असले पाहिजे. वळण तर असते, साधू-संन्यासींना हैराण नाही करण्याची इच्छा असतेच ना ! पण ते डिझाईनपूर्वक असले पाहिजे.
प्रश्नकर्ता : डिझाईनपूर्वक म्हणजे कशा रीतीने दादा?
दादाश्री : त्यात जसे लिहले आहे त्या प्रमाणे, एक्झेक्टनेस.(यथार्थ रूपाने.) बाकी असे तर मला साधू-संतांना हैराण नाही करायचे असे असते, पण तरी सुद्धा ते हैराण करतातच. त्याचे कारण काय आहे? तेव्हा म्हणे, डिझाईनपूर्वक नाही आहे त्यांचे. ते डिझाईनपूर्वक असेल तर असे नाही होणार.
प्रश्नकर्ता : हे जे नव कलमे आहेत ते समजपूर्वक जीवनात आणली पाहिजे?
दादाश्री : नाही, तसे नाही. समजपूर्वक आणायचे नाही. आम्ही काय सांगत आहोत की हे आम्ही जे बोलत आहोत ती शक्ति मागा फक्त. ती शक्तिच तुम्हाला एक्झेक्टनेस मध्ये आणून ठेवेल. तुम्हाला समजपूर्वक करायचे नाही आहे. हे होणारच नाही. समजपूर्वक माणूस करु शकत नाही. जर समजून करायला जाईल तर होणार नाही. निसर्गाला सोपवून द्यायचे. म्हणून हे दादा भगवान शक्ति द्या.' शक्ति ईटसेल्फ उगेल. नंतर मग एक्झेक्ट
येईल.
खूप उंच वस्तु आहे ही. परंतु जो पर्यंत समजले नाही तो पर्यंत सगळे असेच !