________________
३४
भावना सुधारे जन्मोजन्म
करत असेल त्याची हरकत नाही. पण अभिप्राय वेगळा पडला म्हणजे सुटलात ! हे मोक्षमार्गाचे रहस्य आहे, ते जगाच्या लक्षात येत नाही ना !
प्रश्नकर्ता : ही लोकं डिस्चार्ज मध्येच फेरफार मागत आहे, परिणाम मध्ये फेरफार करायला मागत आहे?
दादाश्री : होय, म्हणजे जगाला ह्या लक्ष्यची माहितीच नाही, हे भानच नाही. मी त्याला अभिप्रायपासून मुक्त करायला मागत आहे. आता, 'हे खोटे आहे' असा तुमचा अभिप्राय बसून गेला. कारण की आधी 'हे
खरे आहे' असा अभिप्राय होता आणि तेथून संसार उभा राहिला आणि आता 'हे खोटे आहे' असा अभिप्राय झाला, तर मुक्त झाला. आता हा अभिप्राय पुन्हा कधी, कोणत्या ही संयोगात बदलायला नाही पाहिजे.
ही नव कलमे रोज बोलाल ना, तर मग हळू-हळू कोणा बरोबर भांडण-तंटा नाही राहणार. कारण की स्वता:चा भाव तुटून गेला आहे. आता जे 'रिएक्शनरी' (प्रत्याघाती) आहे तेवढे फक्त राहिले आहे. ते हळू-हळू कमी होत जाईल.
___ महात्मांच्या साठी, ते चार्ज की डिस्चार्ज? प्रश्नकर्ता : भाव आणि भावना ह्या दोघां मध्ये काय फरक?
दादाश्री : चंदूभाई मध्ये हे दोघे ही आलेत ! पण खरं बोललात, भाव आणि भावना मध्ये डिफरन्स आहे.
प्रश्नकर्ता : भावना पवित्र असते आणि भाव चांगला पण असेल आणि वाईट पण असेल.
दादाश्री : नाही, भावना पवित्र असते असे नाही. भावना अपवित्रला पण लागू होते. कोणाचे घर जाळून टाकण्याची भावना होते आणि कोणाचे घर बांधून देण्याची भावना होते. म्हणजे भावना दोन्हीकडे वापरली जाते पण भाव हे चार्ज आहे आणि भावना ही डिस्चार्ज आहे.