________________
भावना सुधारे जन्मोजन्म
दादाश्री : होय, त्याचा अर्थ एवढाच की, 'आपण ह्यात सहमत नाही' असे सांगत आहोत. अर्थात् आपण वेगळे आहोत. आणि हुक्का आपणहून सुटून जाईल तेव्हा खरे. पण आता आपण त्याला चिकटले नाही आहोत, ते आपल्याला चिकटले आहे. त्याची मुदत पूर्ण झाली म्हणजे जाईल असे सांगत आहोत. एका बाजूला हुक्का पीत असाल आणि एका बाजूला ही भावना बोलाल, तर प्यालेले उडून जाईल आणि ह्या भाव ची सुरूवात झाली.
लोकं म्हणतात की, 'या साहेब, या साहेब' पण त्यांच्या मनात काय असते की आता कुठून टपकले? तर आपण काय म्हणतो की हुक्का पीत आहे पण 'असे नाही झाले पाहिजे.' अर्थात् लोकं ह्याहून उलट बोलतात. बाहेर 'या बसा' म्हणतात आणि आत (मनात) म्हणतात की 'हे कुठून टपकले?' तर लोकं सुधारलेले बिघडवतात परंतु आपण बिघडलेले सुधारत असतो.
प्रश्नकर्ता : संपूर्ण अक्रम विज्ञानची अजबच (गोष्ट) आहे ही की बाहेर बिघडले आहे आणि आत सुधारत आहोत.
दादाश्री : होय, म्हणजे संतोष राहतो ना आपल्याला ! की जरी हा घाणा बिघडून गेला तर बिघडून गेला पण आता नवीन घाणा तर चांगला होईल. एक घाणा बिघडून गेला, पण नवीन तर चांगले होईल ना? तेव्हा लोक काय म्हणतात? 'हे आहे तोच घाणा सुधारायचे आहे.' अरे भानगड सोड आता, जाऊ दे, नाहीतर नवीन ही बिघडून जाईल. हे तर घाणा ही गेला नी तेल ही गेले.
प्रश्नकर्ता : आताचे जे बिघडले आहे त्याचे जबाबदार आपण नाही. हे गेल्या अवतारचे परिणाम आहे.
दादाश्री : होय, आज आपण जबाबदार नाही. आज ती सत्ता दूसऱ्याच्या हातात आहे. जबाबदारी आपल्या हातात नाही न ! हे तर