________________
भावना सुधारे जन्मोजन्म
फिरणारच नाही, मग उगीचच हाय-हाय का करता? ! पण तेथे तर गुरु महाराज म्हणतील, 'जर असे झाले नाही तर येऊ नाही देणार.' तेव्हा तो काय म्हणेल, ‘पण साहेब, मला तर खूप करायचे आहे पण नाही होत, त्याला काय करु?' म्हणजे हे समजल्या विनाच थापा- थापी चालत आहे.
३०
प्रश्नकर्ता : हे तर जेव्हा प्रकृति एकदम उलट-पुलट करुन टाकते ना. तेव्हा त्याला आत जबरदस्त सफोकेशन ( घुसमट) होते.
दादाश्री : अरे ते इथपर्यंत होते की पाच पाच दिवस पर्यंत खात नाही. अहो, तो कोणाचा गुन्हा, नी कोणाला मार मार करतात ! पोटाला कशाला मारता ! गुन्हा मनाचा आणि मारतो पोटाला. म्हणेल 'खाने का नहीं तुम्हें.' तर हा काय करेल बिचारा? ! शक्ति निघून जाते ना बिचाऱ्याची. त्याने खाल्ले असेल तर दुसरे काही कार्य करु शकेल. म्हणून मग आपले लोक म्हणतात, रेड्याच्या चुकीमुळे पखाल्याला कशाला डाग देता?! चूक रेड्याची आहे,(म्हणजे) मनाची आहे आणि ह्या पखालचीचा, (म्हणजे) देहाचा बिचाऱ्याचा काय गुन्हा? !
आणि बाहेर झटक झटक केल्याने काय फायदा होणार? जे आपल्या सत्तेतच नाही ना ! मग विना कारणी बोंबाबोंब करण्याचा काय अर्थ? पण आतील सर्व कचरा साफ करावा लागेल, आतील सर्व धुवावे लागेल. हे तर बाहेरचे धुऊन टाकतात, गंगेत जातात तरी ही देहालाच डूबव डूबव करुन उजळ करतात. अरे, देहाला उजळून काय काम आहे ? ! मनाला उजळायचे ना ! मनाला, बुद्धिला, चित्तला, अहंकारला, ह्या सर्वांना, अंत:करणला उजळावयाचे आहे. ह्यात साबण ही कधी घातला नाही. मग तर बिघडून जाईल की नाही बिघडणार?
लहान वय असते तो पर्यंत चांगले राहते. मग दिवसें-दिवस बिघडते आणि कचरा पडतो. म्हणून आपण काय सांगतो की (येथे ) तुझे आचार बाहेर ठेवत जा आणि हे घेत जा. हे सर्व खोटे आहे ते बाहेर