________________
भावना सुधारे जन्मोजन्म
नम्रतावाली भाषेने आपण बोलावे आणि तशी शक्ति मागावी, तर असे करता-करता ती शक्ति येईल. कठोरभाषा बोललांत आणि मुलास वाईट वाटले तर त्याचा पश्चाताप करावा. आणि मुलास सुद्धा सांगायचे की 'मी माफी मागत आहे. पुन्हा असे नाही बोलणार' हाच वाणी सुधारण्याचा मार्ग आहे आणि 'हे' एकच कॉलेज आहे.
प्रश्नकर्ता : तर कठोरभाषा नी तंतलीभाषा आणि मृदुता नी ऋजुता याच्यात भेद काय?
दादाश्री : खूपजण कठोर भाषा बोलतात ना की, 'तू नालायक आहेस. बदमाश आहेस, चोर आहेस.' जे शब्द आपण ऐकले नसतील ना ! अशी कठोर वाणी ऐकल्या बरोबर आपले हृदय स्तंभित होऊन जाते. ही कठोरभाषा जरा सुद्धा प्रिय नाही वाटत. उलट मनात खूप होते की हे सर्व काय आहे? कठोरभाषा ही अहंकारी असते.
तंतीलीभाषा म्हणजे काय? रात्री आपल्या पनि बरोबर भांडण झाले असेल आणि तिने सकाळी चहा देतांना कप आपटून ठेवला तेव्हा तुम्ही समजून जाणार की अहो! रात्री ची गोष्ट आता पर्यंत विसरली नाही ! ह्याला तंत म्हणतात. मग ती जी वाणी बोलणार ती पण अशी तंतीली (टोचणारी) निघत असते.
__पंधरा वर्षा नंतर तुम्हाला कोणी माणूस भेटला (ज्याच्या बरोबर पूर्वी तुमचे भांडण-तंटा झालेले असेल) तो पर्यंत तुम्हाला त्याच्या बाबतीत काहीही आठवत नसेल पण तो भेटल्या बरोबरच जुने सर्व काही आठवते, ताजे होऊन जाते त्याला म्हणतात तंत.
स्पर्धेत जसा तंत असतो ना? 'पहा मी कसा छान स्वयंपाक केला आणि त्यास तर येतच नाही.' असे तंतेत चढतात, स्पर्धेत चढतात. ती तंतीलीभाषा (ऐकण्यास) खूप वाईट असते.
कठोर आणि तंतीलीभाषा बोलू नये. भाषेचे सर्व दोष ह्या दोन शब्दांत