Book Title: Bhavna Sudhare Janmo Janm
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 25
________________ भावना सुधारे जन्मोजन्म ह्या तिरस्कार पासून कधी ही सुटका नाही. त्यात तर नुसते वैर बांधले जातात. कोणाही बरोबर जरासा ही तिरस्कार असेल, ह्या निर्जीव बरोबर तिरस्कार असेल तरी सुद्धा तुम्ही सुटणार नाही. अर्थात् कोणाचा थोडा पण तिरस्कार नाही चालणार. जो पर्यंत कोणासाठी तिरस्कार असेल तो पर्यंत वीतराग नाही होता येत. आणि वीतराग तर व्हावे लागेल, तरच सुटका होईल! कठोर-तंतीलीभाषा न बोलण्याची... प्रश्नकर्ता : ५. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्माशी कधीपण कठोरभाषा, तंतीलीभाषा न बोलण्याची, न बोलावयाची की बोलण्या प्रति अनुमोदन नाही करण्याची अशी परम शक्ति द्या. कोणी कठोरभाषा, तंतीली(हट्टी, स्पर्धावाली,टोचणारी) भाषा बोलले तर मला मृदु-ऋजु भाषा बोलण्याची परम शक्ति द्या. दादाश्री : कठोरभाषा नाही बोलली पाहिजे. कोणा बरोबर कठोरभाषा बोलून गेलात आणि त्याला वाईट वाटले तर आपण त्याच्या हजेरीत म्हणावे की, 'भाऊ, माझी चूक झाली, माफी मागतो' आणि हजेरीत म्हणता येण्या सारखे नसेल तर मग आत मध्ये पश्चाताप करावा की, असे नाही बोलायचे. प्रश्नकर्ता : आणि पुन्हा विचार केला पाहिजे की असे नाही बोलावे. दादाश्री : होय, असा विचार केला पाहिजे आणि पश्चाताप केला पाहिजे. पश्चाताप केला तरच ते (तसे बोलणे) बंद होईल. नाहीतर आपणहून बंद होणार नाही. फक्त बोलण्याने बंद नाही होणार. प्रश्नकर्ता : मृदु, ऋजु भाषा म्हणजे काय? दादाश्री : ऋजु म्हणजे सरळ आणि मृदु म्हणजे नम्रतावाली. अत्यंत नम्रतावाली असते तेव्हा मृदु म्हणली जाते. म्हणजे सरळ भाषा आणि

Loading...

Page Navigation
1 ... 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54