Book Title: Bhavna Sudhare Janmo Janm
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 24
________________ भावना सुधारे जन्मोजन्म १५ करु नये. ह्या वातावरण मध्ये सर्व परमाणूच भरलेले आहेत. म्हणून त्याला पोहचून जाते सर्व काही. एक शब्द सुद्धा कोणासाठी बेजबाबदारीवाला नाही बोलायचा आणि बोलायचे असेल तर काही चांगले बोल. कीर्ति बोल, अपकीर्ति नको बोलूस. म्हणून कोणाच्या निंदा मध्ये नाही पडायचे. स्तुति नाही होत तर हरकत नाही, पण निंदा मध्ये नाही पडायचे. मी सांगतो की निंदा करण्यामध्ये आपल्याला काय फायदा? याच्यांत तर खूप नुकसान आहे. जबरदस्त नुकसान जर कधी ह्या जगात असेल तर ते निंदा करण्यात आहे. म्हणून कोणाचीही निंदा करण्याचे कारण नाही व्हायला पाहिजे. आपल्या येथे निंदा सारखी वस्तुच नाही. आपण समजण्या साठी बोलत आहोत, काय खरं आणि काय खोटं ! भगवानांनी काय सांगितले ? खोट्याला खोटं जाण आणि चांगल्याला चांगलं जाण. पण खोटं जाणते वेळी त्यांवर किंचित्मात्र पण द्वेष नाही झाला पाहिजे आणि खरं जाणते वेळी त्यांवर किंचित्मात्र राग (आसक्ति) नाही झाला पाहिजे. खोट्याला खोटं नाही जाणले तर चांगल्याला चांगलं जाणणे शक्य नाही. म्हणून आम्ही सविस्तर बोलले पाहिजे. ज्ञानी जवळच ज्ञान समजते. अभाव, तिरस्कार नाही करावा... प्रश्नकर्ता : ४. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्मा प्रति किंचित्मात्र पण अभाव, तिरस्कार कधीही नाही केला जाणार, नाही करविला जाणार की कर्ताचे प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या. दादाश्री : होय, बरोबर आहे. आपल्याला कोणाचा अभाव झाला, जसे की तुम्ही ऑफिसात बसले आहात आणि कोणी मनुष्य आला तर अभाव झाला, तिरस्कार झाला. तेंव्हा मग तुम्ही मनात विचार करुन त्या साठी पश्चाताप केला पाहिजे की असे नाही झाले पाहिजे.

Loading...

Page Navigation
1 ... 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54