Book Title: Bhavna Sudhare Janmo Janm
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 18
________________ भावना सुधारे जन्मोजन्म आले तर आम्ही त्याच्या खांद्यावर हात ठेऊन खाजगी मध्ये त्याला विचारु की 'भाऊ हा बिझनेस(धंदा) तुला आवडतो? पसंद पडतो?' मग तो त्याची सर्व हकीकत सांगेल. आमच्या जवळ त्याला भिती नाही वाटणार. माणूस भिती मुळे खोटे बोलतो. मग त्याला समजावणार की 'हे तू करतोस त्याची जबाबदारी काय येते, त्याचे फळ काय आहे त्याची तुला जाणीव आहे?' आणि 'तू चोरी करतोस' तसे आमच्या मनात ही नसते. तसे जर कधी आमच्या मनात असेल तर त्याच्यावर परिणाम होईल प्रत्येकजण आपआपल्या धर्मात आहेत. कोणत्याही धर्माचे प्रमाण नाही दुभावेल, त्याचे नांव स्याद्वाद वाणी. स्याद्वाद वाणी ही संपूर्ण असते. प्रत्येकाची प्रकृति भिन्न भिन्न असते, तरी ही स्याद्वाद वाणी कोणाच्या ही प्रकृतिला हरकत नाही करीत. प्रश्नकर्ता : स्याद्वाद मनन म्हणजे काय? दादाश्री : स्याद्वाद मनन म्हणजे विचारण्यात, विचार करण्यातही कोणत्या ही धर्माचे प्रमाण नाही दुभावले पाहिजे. वर्तनात तर नाहीच झाले पाहिजे पण विचारात ही नाही झाले पाहिजे, बाहेर बोलाल ते वेगळे पण मनात ही तसे चांगले विचार असायला पाहिजे की समोरच्याचे प्रमाण नाही दुभावेल असे, कारण की मनाचे जे (वाईट) विचार असतात ते समोरच्याला पोहचतात. त्यामुळेच तर या लोकांचे चेहरे फुगलेले असतात. कारण की तुमचे विचार तेथे पोहचून परिणाम करतात. प्रश्नकर्ता : कोणा विषयी खराब विचार आला तर प्रतिक्रमण करायचे? दादाश्री : होय, नाहीतर मग त्याचे मन बिघडेल. आणि प्रतिक्रमण केले तर त्याचे मन बिघडलेले असेल तरी ही सुधरुन जाईल. कोणासाठी वाईट किंवा असा-तसा विचार करु नये. असे काहीच करु नये. 'सब सबकी संभालो,' आपआपले सांभाळा बस. दुसरी कोणती भानगड नाही.

Loading...

Page Navigation
1 ... 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54