Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02 Author(s): Nalini Joshi Publisher: Nalini Joshi View full book textPage 4
________________ (आकाशवाणी-पुणे केंद्र, 'चिंतन', पर्युषणपर्व, २००५) ३. अजीव-विचार जैन दर्शनातील 'जीव' विचारानंतर आपण 'अजीव' द्रव्याचा परामर्श घेणार आहोत. जैन तत्त्वज्ञानानुसार हे दृश्य विश्व सत्य अगर वास्तव असून तो सहा द्रव्यांचा समुदाय आहे. ही सहा द्रव्ये म्हणजे जीव, धर्म, अधर्म, आकाश, काल आणि पुद्गल - होत. यातील 'जीव' वगळता उरलेली पाच द्रव्ये अजीव आहेत. पुद्गल हे पहिले अजीव द्रव्य आहे. ज्यांच्या लहानमोठ्या संघातांनी जगातील निरनिराळे अचेतन पदार्थ बनलेले आहेत त्या अणूंना ‘पुदगल' म्हणतात. त्यांच्या ठिकाणी सतत परिस्पंद व परिणाम या क्रिया सुरू असतात. परिस्पंद म्हणजे नुसती हालचाल तर परिणाम म्हणजे त्यांच्या गुणात व पर्यायात म्हणजे अवस्थांमध्ये झालेले बदल. प्रत्येक पुद्गलाच्या ठिकाणी स्पर्श,स, गंध व वर्ण (रूप) हे गुण असतातच. वैशेषिकांनी मांडलेल्या परमाणुवादापेक्षा जैनांचा परमाणुवाद ग्रीक तत्त्वज्ञानस अधिक जवळचा आहे. परमाणूंच्या संघातांना ‘स्कंध' म्हणतात. पुद्गलांचे स्थूल, सूक्ष्म, सूक्ष्मतर असे फरक आहेत कर्माचे सुद्धा अतिशय सूक्ष्म परमाणूच असतात. मृत्यूनंतर जीव हा स्वत:च्या सूक्ष्मतर कार्मण शरीरास घेऊनच दुसऱ्या शरीरात प्रवेशतो. 'धर्म' आणि 'अधर्म' नावाच्या स्वतंत्र तत्त्वांचा विचार जैन दर्शनाने केला आहे. याचा अर्थ सदाचार अगर दुराचार असा नाही. ह्या द्रव्यांनी सर्व लोकाकाश भरून टाकले आहे. यांचे वर्णन आधुनिक परिभाषेतmotion & intertia असे करता येईल. धर्मद्रव्य गतीस सहायक आहे. ते गतीस प्रेरणा देत नाही तर नुसती मदत करते. पाणी, काही माशांना ढकलत नाही, फक्त त्यांच्या गतीला वाव देते. अधर्मद्रव्य हे स्थितीचे उदासीन कारण आहे. स्थितिशील पदार्थांना एका ठिकाणी स्थिर रहाण्यास ते मदत करते. वृक्षाची सावली काही प्रवाशाला रोखून ठेवीत नाही पण सथला निवास सुखकर करण्यास मदत करते. म्हणजे ही स्थिति-गतींना आधारभूत तत्त्वे आहेत. ___चौथे अजीव तत्त्व 'आकाश' (space) हे आहे. सर्व द्रव्य-पदार्थांना अवकाश करून देणे, त्यांच्या अवगाहनास सहाय्य करणे हे आकाशाचे कार्य. आकाशाचे लोकाकाश आणि अलोकाकाश असे दोन भाग मानले. लोकाकाशसहा द्रव्यांनी भरून गेले आहे तर अलोकाकाश नुसतीच अखंड पोकळी आहे. तेथे पदार्थांची गती वा स्थिती शक्य नाही आत्तापर्यंत वर्णिलेली 'जीव' द्रव्य धरून पाच द्रव्ये 'अस्तिकाय' म्हणून संबोधली आहेत. 'पंचास्तिकाय' नावाच्या ग्रंथात त्याचे सविस्तर वर्णन आहे. 'काल' (time) हे सहावे द्रव्य आहे. त्याला लांबी, रुंदी, उंची अशी अनेक परिमाणे किंवा मिती नसतात. कालाचे अणू जणूकाही आडव्या दोऱ्यात मणी ओवावे तसे एकापुढे एक असतात. पदार्थांच्य मध्ये झालेले बदल अगर विकार आपल्याला जाणवून देण्यासाठी आधार-तत्त्व म्हणजे काल. पदार्थात बदल झाला तरी हाच तो पदार्थ' अशी ओळखही काळामुळेच पडते. दिवस, रात्र, महिना, वर्ष अशी गणती म्हणजे व्यवहारातील काळ होय. मुळात तो अखंड आहे. जैनांचा षड्द्रव्यविचार संक्षेपाने अशा प्रकारचा आहे.Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28