Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 02 Author(s): Nalini Joshi Publisher: Nalini Joshi View full book textPage 9
________________ अनेक प्राणिमात्रांना बंधनांपासून मुक्त करतात. भ. महावीर म्हणतात, ‘णारतिं सहते वीरे, वीरे णो सहते रतिं' अर्थात् हे वीरपुरुष संयम साधनेतील स्वत:ची ‘अरति' आणि असंयमातील 'रति' दोन्हीही सहन करत नाहीत. माध्यस्थवृत्ति धारण करतात. __ अत्यंत मोजका, नीरस आणि रुक्ष आहार ते स्वीकारतात. स्वत: अन्न शिजवीत नाहीत. इतरांनी त्यांच्यासाठी बनवलेल्या आहारातील अगदी मोजकी भिक्षा जीवननिर्वाहापुरती ग्रहण करतात. वीराचे लक्षण सांगताना भ. महावीर म्हणतात, 'जागर-वेरोवरए वीरे' अर्थात् हा वीर सदैव अहिंसेविषयी जागृत आणि वैरभावापासून दूर असतो. मेधावी, निश्चयी व विवेकी साधक ‘आत्मगुप्त' असतो म्हणजेच कुशल सेनापतीप्रमाणे स्वत:ला शाबूत ठेऊन ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो. स्वत:च्या मनात डोकावणाऱ्या क्रोध, अहंकार, कपट, लोभ या भावनवर मात करतो. हा वीर क्षेत्रज्ञ' असतो म्हणजेच रणांगणाचा जाणकार आणि रणनीतीत कुशल असतो. भगवद्गीतेतही क्षेत्रक्षेत्रज्ञ अध्यायात शरीराला 'क्षेत्र' आणि आत्म्याला क्षेत्रज्ञ' म्हटले आहे. आचारांगात 'वीर्य' आणि 'पराक्रम' हे शब्द वारंवार उपयोजिले आहेत. हा पराक्रम अर्थातच संयमात आणि आत्मविजयात दडलेला आहे. 'महावीरा विप्परक्कमंति' अशी शब्दयोजनाही आढळून येते. साधनेचा मार्ग कितीही खडतर असला तरी ते वीर मनाची प्रसन्नता घालवीत नाहीत. खिन्न, विमनस्क होत नाहीत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक साधकाची वाटचाल ‘एकट्याने करावयाची मार्गक्रमणा' आहे. યેથી૪ મનુભૂતી પ્રત્યેાવી સ્વતંત્ર સ્વતંત્ર માટે. હા સામુદ્રાયિક મા નાહી. મ. મહાવીર સ્ફળતાત દુરyવરો મયાધીરા अणियट्टगामीणं' - अर्थात् येथे कोणी सोबती नाही आणि खरा वीर मार्गावरून पुन्हा फिरत नाही. आचारांग ग्रंथातील शेवटचे अध्ययन ‘उपधानश्रुत' म्हणून प्रसिद्ध आहे. भ. महावीरांच्या उपदेशांचा संग्रह करणाऱ्या प्रभावी आचार्यांनी ते लिहिले असावे. त्यांनी सांगितलेली 'वीराची लक्षणे' त्यांच्या चरित्रातून कशी दिसम्त ते सांगून अखेरीस म्हटले आहे - 'सूरो संगामसीसे वा, संवुडे तत्थ से महावीरे । पडिसेवमाणे फरुसाई, अचले भगवं रीइत्था ।।' प्रतिक्षणी अहिंसेचे पालन करण्यात दक्ष असलेले हे तीर्थंकर गेली २६०० वर्षे महावीर' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सांगितलेली आध्यात्मिक पराक्रमाची लक्षणे त्यांनी स्वत: तंतोतंत पाळली म्हणून तर त्यांच्याच शब्त सांगायचे तर, ‘एस वीरे पसंसिए' अर्थात् या वीराची एवढी प्रशंसा झाली !!! **********Page Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28