________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
त्याप्रमाणे जीव व कर्मांची अंतकाळातील एकरूपता
(जाणता येत नाही). १५,१६. ज्याप्रमाणे धातू व कीट एकत्र निर्माण झाले असताना
अग्नीच्या योगाने कीटमल जाळून आता सुवर्ण निर्मळ करता येते; त्याचप्रमाणे अनादिकालापासून ( एकत्र ) असलेल्या जीव-कर्माच्या बाबतीत ध्यानयोगाने कर्मकीट नष्ट करून आता जीव विशुद्ध करता येतो. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांच्या योगाने निर्मळ चंद्र ( कांत )मणी पाणी पाझरतो; त्याप्रमाणे जीव सम्यक्त्व प्राप्त करून
कर्ममल सोडून देतो. १८. ज्याप्रमाणे सूर्याने तप्त झाला असताना सूर्य (कांत) मणी
अग्नी सोडतो; त्याप्रमाणे खरोखर स्वतः तपाने तप्त ( श. शोषित ) झालेला जीवही अनंतज्ञान प्रकट करतो (श. ज्ञान मिळवितो). ज्याप्रमाणे चिखलाचा लेप ( धुवून ) गेलेला भोपळा लगेच पाण्यावर (तरंगत) राहतो; त्याप्रमाणे सर्व कर्मापासून सुटलेला जीवही लोकानाच्या ( सिद्धशिले ) वर (अनंत चतुष्टयांच्या तेजाने झळाळत) विराजमान होतो
For Private And Personal Use Only