Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
(१४)
५.११ वारिसेन :
भावनावेगात येऊन अनेक माणसे अनेक कार्य करतात. परंतु भावनावेग ओसरल्यानंतर ते कार्य टिकविणे किती कठीण असते हे नित्य जाणवते. विचारी पुरुषांनी प्रचंड इच्छा शक्तीच्याद्वारे असे भावनाप्रधानी लोक सदैव सांभाळले पाहिजे त्याशिवाय धर्ममार्गाची परंपरा चाल शकत नाही. जगात भावना, विचार व इच्छा ह्या प्रचंड शक्ती आहेत. त्यांचे मानवाच्या मनावर नियंत्रण असते. जो माणूस ह्या गोष्टीवर नियंत्रण बसवितो तो सफल नेता, शास्ता, आचार्य, होय ह्यात शंका नाही. साधुपदाच्या स्वीकारानंतर आपल्या कुरूप बायकोच्या स्मरणाने व्याकुळ झालेल्या पुष्पडालाला आपल्या घरी नेऊन अथांग वैभवाचे प्रदर्शन दाखवून धक्का देऊन स्थिर करणाऱ्या वारिसेनांना कोण विस शकेल ?
५.१२
विष्णूकुमार
गाय प्राण पणाला लावून वत्साचे रक्षण करते तसे माणसाने तनमनधन पणाला लावून धर्माचे रक्षण केले पाहिजे. तत्त्व सर्वांना माहित असते. आचरणात आणणारा पुरुषोत्तम विरळाच असतो. 'सत्यं वद' हा पाठ समजला नाही अशी कबुली देणारा युधिष्ठिरासारखा विद्यार्थी आगळाच असतो. त्याप्रमाणे संकट आले असता माणसाची कसोटी लागते. त्यात 'विष्णू कुमार' कसोटीत उतरले असे म्हणावे लागते. त्यासाठी पुस्तकातील लिखित आचार बाजूला ठेवला. काळवेळचे भान न ठेवता, नात्यागोत्यांच्या संबंधाकडे लक्ष न देता मुनीना वाचविण्याच्या एकाच सदिच्छेने प्रेरित होऊन नंगानाच करणान्या समाजातील व्यक्तींना त्यांनी ज्याप्रकारे दंडित केले ती गोष्ट सर्वसाधारण नीति नियमात बसत नाही. परंतु निर्मल आशय असल्यास केलेली कोणतीही कृती ही निर्मल आहे ही गोष्ट विष्णुकुमाराच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org