Book Title: Jain Vidyache Vividh Aayam Part 03
Author(s): Nalini Joshi
Publisher: Nalini Joshi

View full book text
Previous | Next

Page 11
________________ व्या शतकात राज्य करीत होता. तोही अतिशय शूर व पराक्रमी होता. तसेच तो अतिशय हुशार व उदारमतवादी होता. न्यायाने राज्य करीत होता. सुखी जीवनाकरिता खरा धर्म जाणून घेण्याची त्याला उत्कंठा होती व प्रबळ इच्छा होती. गुजराथेत आलेल्या जैन आचार्य हेमचंद्रसूरि यांच्या प्रभावाने त्याने जैनधर्म स्वीकारला व त्याचा सर्वांगाने प्रसार केला. आचार्य हेमचंद्रांनी कुमारपाल राजाला कथांद्वारे उपदेश दिला. प्राण्यांची हिंसा, छूत, मांसाहार, मद्यपान, वेश्यागमन इ. सप्त व्यसनांचे भयानक परिणाम त्यांनी दाखवून दिले. एवढेच नाही तर राजाला या व्यसनांना राज्यात बंदी घालण्याकरिता सांगून तसा राजादेशही काढविला. खरे देव, खरे गुरू व खरा धर्म याविषयी सांगून इतर धर्मतले मिथ्यात्व व अंधश्रद्धा दाखवून दिली. याकारणाने कुमारपालराजा श्रद्धायुक्त होऊन जैनधर्माकडे ओढला गेला. ____ कुमारपाल राजाने नंतर राज्यात जैन मंदिरे उभारली. त्यांना स्वत: भेटी देऊ लागला. अष्टाह्निकांसारखे जैनांचे उत्सव साजरे करू लागला त्याने अनेक समाजोपयोगी कामे केली. दुर्बल घटकांकरिता अन्न व वस्त्रे देण्याची व्यवस्था केली. धार्मिक कृत्यांकरिता पौषधशाळा निर्माण केल्या. गिरनार पर्वतावरील जैन मंदिराकडे जाण्याकरिता पायऱ्या बांधल्या. ___ कुमारपाल राजाने आचार्य हेमचंद्रांकडून १२ श्रावक व्रते ग्रहण केली. मरेपर्यंत त्याने त्यांचे निष्ठापूर्वक आचरण केले. कुमारपाल राजाच्या मृत्यूनंतर सुमारे ११ वर्षांनी आचार्य हेमचंद्रांचे शिष्य सोमप्रभसूरि यांनी 'कुमारपालप्रतिबोध' या ग्रंथाची रचना केली. यात आ. हेमचंद्रांनी कुमारपाल राजाला उपदेश देताना सांगितलेल्या कथा ग्रथित केल्या आहेत. या ग्रंथाची भाषा जैन महाराष्ट्री असून यातील काही प्रस्ताव संस्कृत व अपभ्रंश भाषेत आहेत. यावरून सोमप्रभसूरींची प्रकांड पंडितता व विविध भाषांवरचे प्रभुत्व दिसते. या ग्रंथात सप्तव्यसनांसहित एकूण ५४ कथा आहेत. या कथा अतिशय रंजक व बोधप्रद आहेत. ___ जैन पुराणातील राजांचा विचार करताना वर उल्लेखिलेल्या चार राजांचा प्रामुख्याने विचार केला. त्या पाठीमागील कारणमीमांसा अशी आहे. ___ भद्रबाहूरचित कल्पसूत्रात वृषभ, अरिष्टनेमि, पार्श्वनाथ, महावीर अशा चार तीर्थंकरांची चरित्रे दिली आहेत. उरलेल्या २० तीर्थंकरांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. या चार तीर्थंकरांपैकी क्षत्रिय राजे म्हणून ऋषभदेवाचे नाव घेतले जाते. तसेच ते घेतले जाते ते त्यांच्या कर्तृत्वाबद्दलही. दुसरे कारण असे की ऋषभदेवांना वैदिक, जैन, बौद्ध अशा तिन्ही साहित्यात पुष्टी मिळालेली दिसते. राजा म्हणून व धर्माचा प्रसार करणारे म्हणून ऋषभदेवांबद्दल वर माहिती दिली आहे. करकंडु, नमि, द्विमुख व नग्गति अशा चार प्रत्येकबुद्धांचा उल्लेख उत्तराध्ययनसूत्रात केलेला आढळतो. या चौघांना जैन व बौद्ध धर्मात मान्यताही आहे. तरीही करकंडु राजा पार्श्वनाथांच्या काळातला जैन राजा असण्याची दाट शक्यता आहे. तसेच अपभ्रंश भाषेत करकंडुचरिउ हा ग्रंथही उपलब्ध असल्याने त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळते. खारवेल हा सर्वात जुना जैन परंपरा असलेला व शिलालेखी पुरावा असलेला एकमेव राजा होय. जैन कथांमध्ये चंद्रगुप्त व चाणक्य यांचे वर्णन जैन म्हणून केलेले दिसते. या दोघांनीही दीक्षा घेतली. चंद्रगुप्त आ.भद्रबाहूंबरोबर कर्नाटकात श्रवणबेळगोळ येथे आला. तेथे चंद्रगुंफेमध्ये त्याने संथारा व्रत धारण केले. आदि वृत्तांत जैन याग्रंथांमध्ये आढळतात. परंतु चंद्रगुप्त हा प्रत्यक्ष जैन धर्मावलंबी असल्याचे इतिहासकार मानीत नाहीत. या पार्श्वभूमीवर सर्व इतिहासकारांनी सम्राट खारवेल यांचे जैन धर्मावलंबन मान्य केले आहे व त्याचेच शिलालेखही असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्याची माहिती वर दिली आहे. प्राचीन इतिहासाच्या तुलनेत त्यामानाने अर्वाचीन काळात म्हणजे इसवी सनाच्या १२ व्या शतकात होऊन गेलेला चालुक्यवंशीय राजा कुमारपाल याची ऐतिहासिकता सर्व इतिहासकारांनी मान्य केली आहे. वाङ्मयाच्या आधारे ऐतिहासिकतेचा शोध घेणे हे काम अतिशय अवघड आहे. अशा परिस्थितीत जैन

Loading...

Page Navigation
1 ... 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26