________________
जैन दर्शनातील सर्वात महत्त्वपूर्ण विचारधारा पुढीलप्रमाणे व्यक्त करता येते. :
या समस्त विश्वाच्या मुळाशी दोन मुख्य तत्त्वे आहेत. जीव (consciousness) आणि अजीव (matter). ही दोन्ही तत्त्वे अनादि काळापासून अस्तित्वात आहेत. ती सतत एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्या संपर्कातून विशिष्ट 'बंधने' अथवा 'शक्ती'ची निर्मिती होते. त्यामुळे प्रत्येक जीवाला (आत्म्याला) अनेक अवस्थांमधून जावे लागते. ही संपर्काची धारा जर रोखली आणि उत्पन्न झालेली बंधने जर्जरित करून क्षयाला नेली तर तो जीव आपल्या शुद्ध, बुद्ध, मुक्त अशा नैसर्गिक स्व-स्वरूपात विराजमान होतो. हीच जैन दर्शनातील सात नैतिक-आध्यात्मिक तत्त्वे अथवा पदार्थ होत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
___ 'जीव' आणि 'अजीव' या दोन तत्त्वांचे विस्तृत व सूक्ष्म वर्णन हा जैन तत्त्वज्ञानाचा मुख्य विषय आहे. 'आस्रव' आणि बंध' यांचे विवेचन जैनांच्या सुप्रसिद्ध कर्म-सिद्धांता'त येते. जैनांचे सारे मानसशास्त्र यात समाष्टि आहे. संवर' आणि 'निर्जरा' हे चारित्रा'शी अर्थात् आचारशास्त्राशी निगडित आहेत. 'मोक्ष' ही जीवाची सर्वोत्कृट अवस्था असून ती प्राप्त करणे हे सर्व धार्मिक क्रियांचे आणि आचरणाचे अंतिम ध्येय आहे.
लोकाकाशात समाविष्ट असणाऱ्या विश्वाला 'लोक' अशी संज्ञा जैन दर्शन देते. हे विश्व म्हणजे महास्कंध आहे. या विश्वाच्या आकाराबद्दल जैनांचे म्हणणे लक्षणीय आहे. एखादा पुरुष आपले दोन्ही हात दोन बाजूंनी कमरेवर ठेवून, दोन पाय आडवे पसरून जर उभा राहिला तर त्याचा आकार जसा दिसेल तसा या विश्वाचा (लोकाचा) आकार आहे.
(ब) विश्वाचे सहा मूळ घटक अर्थात् ‘षड्-द्रव्ये' :
आपल्या सभोवताली आपल्याला सातत्याने जाणवणारे विश्व (की ज्याचा आपणही एक घटक आहोत) हे सहा खऱ्याखुऱ्या द्रव्यांनी बनले आहे. त्या Realities म्हणजे वास्तविकता' आहेत. हे सहा घटक सतत अस्तित्वात आहेत. त्यांच्यात परिवर्तने होत असली तरी त्यातील एकही घटक नव्याने निर्माण झालेला नाही व कधीही पूर्णपणे नष्ट होणारा नाही. द्रव्य म्हणजे 'विश्वाचा असा वास्तव घटक की जो सतत परिवर्तन पावत असूनही कायम टिकून आहे.' आत्यन्तिक 'शाश्वतता' आणि आत्यन्तिक क्षणभंगुरता' या दोन्ही परस्परविरूद्ध टोकांचा समन्वय जैनांच्या 'द्रव्य' या संकल्पनेत दिसतो.
द्रव्यांमधला जो बदलणारा धर्म आहे त्याला पर्याय' (अवस्थांतर) म्हटले आहे. जो न बदलणारा धर्म आहे त्याला 'गुण' म्हटले आहे. प्रत्येक द्रव्य गुण-पर्यायांनी युक्त असते. 'अस्तित्व'रूप समान गुणधर्म असणारी द्रव्ये एकूण सहा आहेत. त्यामुळे जैन विचारधारा एकतत्त्ववादी (monistic) नसून बहुतत्त्ववादी (pluralistic) आहे. एकूण सहा द्रव्यांपैकी जीव, पुद्गल, धर्म, अधर्म आणि आकाश या पाच द्रव्यांना ‘अस्तिकाय' म्हणतात. कारण या द्रव्यांचे भाग किंवा प्रदेश' आपण कल्पनेने वेगळे करू शकतो. 'काल' हे सहावे द्रव्य मात्र एकामागून एक येणग्या क्षणांचे बनलेले असल्याने त्यांचा एकजिनसी प्रचय म्हणजे समूह बनू शकत नाही. म्हणून काल ‘अस्तिकाय' नाही. 'अनस्तिकाय' आहे.
(१) पहिले द्रव्य आहे 'जीव' अर्थात् 'आत्मा'. चैतन्य किंवा जाणीव हे जीवाचे लक्षण आहे. विश्वात अनंत जीव आहेत व ते स्वतंत्र आहेत. कोण्या एका ईश्वराचे, परमात्म्याचे अंश नाहीत. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सौख्य आणि अनंत वीर्य (पुरुषार्थ, सामर्थ्य) हे जीवाचे खरे स्वरूप आहे. कर्मांमुळे ते झाकोळले जाते. जीवाला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले की हे चार गुण प्रकट होतात. 'जीव' तत्त्वाची अनेक दृष्टींनी केलेली चिकिसा हे जैन दर्शनाचे वैशिष्ट्य आहे. इतकी विविधांगी चिकित्सा दुसऱ्या कोणत्याही धर्माने केलेली नाही. इंद्रियांच्या संख्येनुसार केलेली जीवांची वर्गवारी बरीचशी शास्त्रीय आहे. एकंदर १४ मुद्यांनी 'जीवां'चा शोध घेतला आहे. तो मुळातूनच पहाण्यासारखा आहे. पृथ्वी, आप (जल), तेज, वायू व वनस्पती हे सर्व स्थावर जीव आहेत. ती केवळ जड महाभूते नाहीत. पृथ्वी, खनिजे, पाणी, अग्नि, वनस्पती, वायू इ. सर्वांना सजीव मानल्याने जैनांची अहिंसा