Book Title: Jain Sahityatil kahi pramukh Acharya va tyanche pramukh granth Author(s): A S More Publisher: Z_Anandrushi_Abhinandan_Granth_012013.pdf View full book textPage 4
________________ Aainamw-JANKRABAIKALAJAJARAJAMANAVSSASAJANAMANABAJAJAAMAAMAALAAAAAAAAADuos आचार्यप्रवभिआार्यप्रवभि आनन्न्श्राआनन्दान्थर २१० इतिहास और संस्कृति परंपरेनुसार त्यांनी प्रथम संस्कृतचा गाढा आभ्यास करून संस्कृतमध्येच ग्रंथरचना केली, प्राकृत तथा जैनशास्त्राचा अभ्यास करावयाचा असलेतर, जिनदीक्षा घ्यावी लागेल ही अट असल्यामुले त्यानी जैनदीक्षा स्वीकारली, आपल्या ज्ञानाच्या गर्वामुले 'ज्याचे वचन मला कलणार नाही त्याचे भी शिष्यत्व पत्करेन' असे शब्द कोरलेला एक सुवर्णपट गलयात अडकबून त बिहार करीत होते पण पुढे त्यांचा 'चक्किदुगं हरिपणग'... या श्लोकामुले पराजय झाला अर्थात तो पराजय याकिनी महत्तरेने केला होता, म्हणूनच पुटे ते स्वत:ल 'या किनीसुत' अथवा 'धर्मतो याकिनीमहत्तरासूनु' या विशेषणात स्वतःला धन्य मानीत । आ० हरिभद्रसूरि जैनधर्मातीलच नव्हे तर भारतातील एक महान आचार्य होऊन गेले त्यांच्या ज्ञान विषयक ग्रंथांना दोन्ही संप्रदायांची मान्यता आहे प्रो किल्हॉर्न हयुलार, हयुलर पिटर्सन, जेकोबी इ० पाश्च्यात्य विद्वानांनी त्यांच्या ग्रंथभांडाराचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न केला तर विंटरनिट्स, जेकोबी, लायमन, सुवाली व शब्रिग इ० विद्वानांनी त्यांच्या ग्रंथाविषयी व जीवनविषयक पुष्कल चर्चा केली आहे, पाश्चात्य विद्वानांच्या विद्वत्तेवा एक विषय होऊन बसणे, यावरूनच हरिभद्र सूरोची प्रतिभा किती महान असेल हे स्पष्ट होते। हरिभद्रसूरीना 'भव विरह' या दुस-या विशेषणाने संबोधिले जाते अर्थात हे विशेषण त्यांच्या प्रत्येक ग्रंथकृतीच्या शेवटी दिलेल आढ़लत हे विशेषण त्यांना पुढीत तीन कारणावरून मिलाले असावे धर्मस्वीकार प्रसंगी, शिष्यांच्या वियोगाप्रसंगी, याचकांच्या आशिर्वाद प्रसंगी, आ० हरिभद्रसूरी उद्योत्तनाचे गुरु असून जिनभद्राचे शिष्य होते, त्यांनी १४०० प्रकरण ग्रंथ रचले होते, असे म्हटले जाते, त्याचे षड्दर्शन समुच्चय, शास्त्रवार्तासमुच्चय, अनेकान्तवाद प्रवेश-अनेकान्त जयपताका इ. ग्रन्थ प्रसिद्ध, आहेत, संस्कृत प्राकृत दोन्ही भाषेवर त्यांचे पूर्ण प्रभुत्व होते, योगाविषयक योगाबिंदू व योगशास्त्र हे दोन ग्रंथ लिहिले तर, समराइच्चकहा व धूर्ताख्यान हे दोन अतिप्रसिद्ध कथा ग्रंथ लिहिले, अर्थात साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात त्यानी संचार, केलेला दिसतो प्रस्तुत ठिकाणी त्यांच्या 'षड्दर्शन समुच्चय' या महत्वाच्या ग्रंथाची थोडीफार माहिती देण्यात आली आहे । भारतीय दर्श चे प्रतिपादन करणारी सर्व प्रथम जैन ग्रंथरचना आ० सिद्धसेन दिवाकर यानी केलेली दिसते, त्यांच्या नंतरच आ० हरिभद्रसूरींचे नाव घेतले जाते, हरिभद्राने षड् दर्शनसमुच्चय या ग्रंथात सहा दर्शनांचे विवेचन केले आहे, हे सर्व विवेचन पद्यबद्ध आहे, सिद्धसेन दिवाकर आचार्यांच्या मानाने हरिभद्रसूरिने अगदी साध्या व सरल रीतिने दर्शनांचे विवेचन केले आहे, षड्दर्शन समुच्चय हा ग्रंथ इतका महत्वपूर्ण मानला जातो की, हरिभद्रसूरिनंतर या ग्रंथाचा उल्लेख मर्वसिद्धांत प्रवेशक, सर्वसिद्धांत संग्रह, सर्वदर्शन संग्रह, जैनाचार्य राजशेखरकृत षड्दर्शन समुच्चय व माधवसरस्वतीकृत सर्वदर्शनकौमुदी या पाच ग्रन्थामध्ये केला गेला आहे।। 'षड्दर्शन समुच्चय' हया ग्रंथातील ८७ श्लोक अनुष्टुप छंदात आहेत, हरिभद्रसूरींनी देवता आणि तत्व या मूल भेदावरून बौद्ध, नैयायिक, सांख्य, जैन, वैशेषिक व जैमिनीय या सहा दर्शनाचा विचार केल आहे, या सहा दर्शनानुसार या सहा ग्रंथतील प्रथमच्या११ श्लोकामध्ये बौद्ध दर्शनाची चर्चा केली असून IAAD ANNEL Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.orgPage Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11