Book Title: Gyanarnava
Author(s): Padma Killedar
Publisher: Z_Acharya_Shantisagar_Janma_Shatabdi_Mahotsav_Smruti_Granth_012022.pdf

View full book text
Previous | Next

Page 10
________________ आचार्य शुभचंद्रकृत ज्ञानार्णव २१३ प्रदेश तीन समयांत व दण्ड कपाट प्रखर रूप होऊन चौथ्या समयांत लोकपूरण होतात. व बाकी कर्माची स्थिती समान करून बादरकाययोगात स्थिर राहून बादर वचनयोग व बादर मनोयोग सूक्ष्म करतात व पुनः काययोग सोडून त्याची स्थिती कमी करून काययोग सूक्ष्म करतात. नंतर वचनयोग मनोयोगाचा क्षणात निग्रह करतात. ह्या प्रक्रियेला सूक्ष्मक्रिया प्रतिपाती म्हणतात. व समुच्छिन्न क्रिया हे चौथे शुक्लध्यान, ह्यांत काययोगाच्याही सूक्ष्म राहिलेल्या क्रिया मिटतात. हे ध्यान अयोगी जिनांना होते. ह्या दोन गुणस्थानांत ध्यान उपचारमात्र आहे. योग आहे पण सूक्ष्म वा काहीही योगक्रिया नाही. व अयोगी गुणस्थानात बाकीच्या १३ अघाती कर्मप्रकृतींचा नाश होतो. व ह्या १४ व्या गुणस्थानातून फक्त पाच लघुअक्षरांचे उच्चारण होईपर्यंत थांबतात व स्वभावानेच कर्मबन्धरहित शुद्धात्मा ऊर्ध्वगमन करतात व सिद्धात्मा होतात. अतीन्द्रिय अव्याबाध, व स्वाभाविक सुख मिळवितात. व मोक्ष हे शुक्लध्यानाचे फळ आहे. ह्याप्रमाणे ह्या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय मधुर मोक्षफलाने संपवितात. ह्या ग्रंथात आचार्यांना मोक्षसाधनेला साधकतम कारण जे संवर व निर्जरा अहे, त्यात ध्यान हे अधिकच साधकतम कारण आहे. म्हणून संवरनिर्जरेला व परंपरेने मोक्षाला कारणीभूत असणाऱ्या ध्यानांचे त्यांनी विस्तृत पण कंटाळवाणे नव्हे तर काव्यशैलीने अतिशय रोचक वर्णन केले आहे. ध्यान म्हणजे कष्टसाध्य दुष्कर अशी योगसाधना नसून दुर्लभ असणाऱ्या ज्ञानसाधनेने विशुद्ध ध्यानसाधनेत विशुद्धिपूर्वक स्वच्छता वा एकाग्रता वा क्षयोपशमिक ज्ञानभावाची उपयोगात स्थिरता म्हणजे ध्यान होय. म्हणून ध्यानसाधनेची पूर्वपीठिका म्हणून ज्ञानसाधना, वैराग्य भाव, संवेगी निर्वेगी कामभागनिर्विणा अशी अशुभ व हेय असणाऱ्या आर्त रौद्र ध्यानापासून परावृत्त करणारी, नंतर शुभ ध्यान धर्मध्यानात प्रवृत्ती करण्याची प्रेरणा भव्य जीवाला दिली आहे. ह्या खंडात ह्या काळात धर्म्यध्यानच प्रामुख्याने होऊ शकते. शुक्लध्यानाची शक्यता नाही म्हणून वा शुक्लध्यानाचे साधकतम साधन म्हणून धर्म्यध्यानाचे विस्तृत व विविध प्रकाराने वर्णन केले आहे. खरोखर धर्म्यध्यानाचे वर्णन वाचताना वाचकाला एकाग्र, तन्मय होऊन ध्यानी बनूनच रस घ्यावा लागतो. त्याशिवाय क्षिप्त मताला त्याची अवीट गोडी, निरलस अखंड माधुर्य चाखता यायचे नाही. ज्ञानसाधनेनेच ध्यानसाधना व ध्यानसाधनेने परंपरेने मोक्षसाधना हेच तत्त्व आचार्यांना निर्विवादपणे आपणा मुमुक्षु वाचकासमोर प्रवाही अर्थगतीने, सुबोध भाषाशैलीने, अलंकारिक रचनेने, लालित्यपूर्ण पदरचनेने एकमेव अनुपम रसाने सजवून विविध प्रकारच्या रसिकांसमोर मांडायचे होते. व त्याबरोबरच अन्य सांप्रदायाचे ध्येयविषय, ध्यानांग, ध्यान, परिकर धारणादिक मान्यतेचे संपूर्णपणे उच्चाटन न करता जैन रूपात म्हणजे जैन तत्त्वज्ञानाच्या भरभक्कम तत्त्वाच्या बैठकीत बसवून आपले तत्त्व न सोडता जनमनाला जणू त्यांनी काबीज केले. तत्कालीन मान्य असणाऱ्या काम, गरुड व शिव तत्त्वाचे आत्मरूपात विसर्जन करून विशाल पण सखोल दृष्टिकोन स्वीकारून नव्या रूपात स्पष्टीकरण दिले आहे व पिंडस्थ, पदस्थ, रूपस्थ व रूपातीत ही चार प्रकारच्या ध्यानाची जणू नवी दालने आपणासारख्या ध्यानप्रेमी रसिकांकरिता खुली केलीत. जैन योगसाधनेत तर ही अत्यंत नवी प्रभावी परिणामकारक देन होय. पिण्डस्थ ध्यानात पाच धारणांनी स्वाधीन चितवनाने चित्ताला वश करण्याचा उपाय आहे. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 8 9 10 11