________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
तर समकित झाल्यानंतर संपते, त्याशिवाय संपत नाही. तोपर्यंत एकही चूक संपत नाही. तोपर्यंत तर आधी खोदतो आणि पुन्हा भरतो. खोदतो आणि भरतो. खोदतो आणि भरतो. कोणतीच क्रिया त्याला कामास येत नाही. सर्व क्रिया निष्फळ ठरतात!
त्याला म्हणतात जैन तुमच्यात दोन-चार दोष तरी असतील की नाही? प्रश्नकर्ता : जास्त असतील. दादाश्री : दहा पंधरा दोष असतील? प्रश्नकर्ता : मोजले तर मोजताच येणार नाहीत.
दादाश्री : हो. त्यालाच जैन म्हटले जाईल. जैन कोणाला म्हणू शकतो की, स्वत:मध्ये अहंकार आहे, दोष आहे, अशी ज्याला खात्री आहे. जरी त्याला दोष दिसत नसतील, पण दोष आहेत अशी ज्याला श्रद्धा आहे, त्याला जैन म्हटले जाते. स्वतः अनंत दोषांचे भांडार आहे पण ते भांडार तुम्ही केव्हा रिकामे करु शकाल?
प्रश्नकर्ता : ती तर आपली कृपा होईल तेव्हा. दादाश्री : खूप मोठी गोष्ट बोलतात!
जेवढे दोष, तेवढेच पाहिजेत प्रतिक्रमण अनंत दोषांचे भांडार आहे, म्हणून तेवढे प्रतिक्रमणही करावे लागतील. जेवढे दोष भरुन आणले आहेत, ते तुम्हाला दिसतील. ज्ञानी पुरुषांनी ज्ञान दिल्यानंतर दोष दिसतील, नाहीतर स्वत:चे दोष स्वतःला दिसत नाहीत, त्याचेच नाव अज्ञानता. स्वत:चा एकही दोष दिसत नाही आणि दुसऱ्यांचे पाहायचे असतील तर खूप सारे पाहू शकतो, त्याचे नाव मिथ्यात्व.
ज्ञानी पुरुषांनी ज्ञान दिल्यानंतर, दिव्यचक्षू दिल्यानंतर स्वतःला