________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
आव्हान नसेल तर पूर्णतेची प्राप्ती
या जगात कोणतीही व्यक्ती तुमचे काही नुकसान करते, त्यात ती निमित्त आहे. नुकसान तुमचे आहे म्हणून रिस्पॉन्सिबल (जबाबदार) तुम्ही आहात. कोणतीही व्यक्ती कुणाचे काहीच करु शकत नाही, असे हे स्वतंत्र जग आहे. आणि जर कोणी काही करु शकत असते तर भीतीला मर्यादाच उरली नसती! मग तर कोणी कोणालाही मोक्षाला जाऊच दिले नसते. महावीर भगवंतांना सुद्धा मोक्षाला जाऊ दिले नसते! महावीर तर सांगतात की, तुम्हाला जे अनुकूल वाटत असेल तसे भाव माझ्यासाठी करा. तुम्हाला माझ्यावर विषय विकारी भाव येत असतील तर विषय विकारी भाव करा, निर्विषयी भाव येत असतील तर निर्विषयी भाव करा, धर्माचे भाव येत असतील तर धर्माचे भाव करा, पूज्यपदाचे भाव येत असतील तर पूज्यपद द्या. शिव्या द्यायच्या असतील तर, शिव्या द्या. मी कशालाही आव्हान करत नाही. जो कशाचेही आव्हान करत नाही, तो मोक्षाला जातो आणि आव्हान करणाऱ्याला येथेच पडून राहावे लागते.
नाहीतर हे जग असे आहे की, ते तुमच्यावर चांगले किंवा वाईट भाव निरंतर करतच राहील. तुम्ही खिशात पैसे ठेवत असाल आणि जर एखाद्या खिसेकापूने ते पाहिले तर तो खिसा कापण्याचा भाव करणार की नाही? की याच्याकडे पैसे आहेत म्हणून याचा खिसा कापला पाहिजे. पण तेवढ्यातच गाडी आली आणि तुम्ही गाडीत बसून निघून गेलात आणि तो तिथेच राहिला. पण लोक असे भाव करतातच. तुम्ही त्यांचे आव्हान स्वीकारत नसाल तर कोणीही तुमचे नाव घेऊ शकत नाही. कुणाच्याही भावात जर तुमचा भाव सामावला नसेल तर कोणी तुम्हाला बांधू शकत नाही. असे जर कोणी बांधले तर कधी अंतच येणार नाही ना ? तुम्ही स्वतंत्र आहात, कोणीही तुम्हाला बांधू शकत नाही.
एकामधून अनंत, अज्ञानतेने
हा डोळा जर हाताने दाबला गेला तर वस्तू एक असूनही दोन