________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दिसतात. डोळा, हे आत्म्याचे रियल स्वरुप नाही, ते तर रिलेटिव्ह स्वरुप आहे. तरी सुद्धा, एक चूक झाल्यामुळे एका ऐवजी दोन दिसतात ना? हे काचेचे तुकडे जमिनीवर पडलेले असतील तर त्यात कितीतरी डोळे दिसतात? थोड्याशाच चुकीमुळे कितीतरी डोळे दिसतात? त्याचप्रमाणे हा आत्मा स्वतःहून दाबला जात नाही पण संयोगाच्या प्रेशरमुळे (दबावामुळे) एकाची अनंत रुपे दिसतात. हे संपूर्ण जग भगवत् स्वरुप आहे. या झाडाला कापण्याचा फक्त भाव जरी केला तरीही कर्म बांधले जाते असे आहे. समोरच्या व्यक्तीसाठी थोडासाच खराब विचार केला तरीही पाप लागते आणि चांगला विचार केला तर पुण्य बांधले जाते.
__ आपण इथे सत्संगात आलो आणि इथे माणसे उभी असतील तर मनात असे येते की हे सर्व इथे का उभे आहेत? असे भाव बिघडतात. तेव्हा त्या चुकीसाठी लगेचच प्रतिक्रमण करावे लागते.
दोनच वस्तू विश्वात संयोग आणि शुद्धात्मा हे दोनच आहेत. संयोग का निर्माण झालेत? संयोग सर्वांना वेगवेगळे येतात. हो, एखाद्याला संपूर्ण आयुष्यात कोणी मारणारा भेटतच नाही आणि एखाद्याला आयुष्यभर अनेकदा मार खावा लागतो. तर याला असा संयोग जुळून येतो आणि त्याला तसा, असे का घडते? कारण त्याने कधी कुणाला मारण्याचा भावच केला नव्हता म्हणून त्याला असे संयोग आणि ह्याने मारण्याचे भाव केले होते म्हणून याला तसे (मार खाण्याचे) संयोग जुळून येतात. अर्थात, हे संयोग कशाने जुळून आलेत, याचीही कारणे सापडतील असे आहे. हे संयोग कोणत्या कारणांनी जुळून आले हेही समजू शकते.
रस्त्यात एखादा गरीब माणूस भेटला आणि तो खूप रडत असेल म्हणून तुम्ही त्याला अकरा रुपये देत असाल, तेव्हा हा भाऊ म्हणेल की, 'राहू द्या ना, त्याला फक्त एकच रुपया द्या, अकरा रुपये कशासाठी देता?' आता तो पैसे घेणारा, तुम्ही पैसे देणारे, आणि या भाऊने मनाई केली