________________
जग निर्दोष
१२९
असे शीलवान मागील पंचवीसशे वर्षांत झाले नाहीत. मागील पंचवीसशे वर्षांची जी कर्म आहेत, त्यात असे शीलवान कोणी होऊ शकतच नाही. शील येते खरे पण पूर्णता येत नाही.
प्रश्नकर्ता : पण शीलच्या दिशेने तर जाऊ शकतो ना? दादाश्री : हो जाऊ शकतो.
प्रश्नकर्ता : तर तिथे जाण्यासाठी काय करावे? हा माझा सर्वात मोठा कठीण प्रश्न आहे. त्यासाठी काय करावे? ते समजतच नाही.
प्रश्नकर्ता : थोडक्यात समजून घ्यावे की कुणा शत्रू विषयी सुद्धा आपले भाव बिघडवू नये आणि जर बिघडला असेल तर प्रतिक्रमणाने सुधारुन घ्या. भाव बिघडतो तो आपल्या कमतरतेमुळे बिघडतो. म्हणून त्यास प्रतिक्रमाणाने सुधारुन घ्यावे! असे करत-करत ती वस्तू सिद्ध होईल.
आणि दुसरे म्हणजे या जगात कोणीही दोषी नाहीच मुळी. खरोखर प्रत्येक जीव निर्दोषच आहे, या जगात. दोषी दिसते हीच भ्रांती आहे. कोणीही दोषी नाही. हे 'त्याच्या लक्षात राहिले पाहिजे.
प्रश्नकर्ता : पण हे बुद्धीने समजणे खूप कठीण आहे.
दादाश्री : बुद्धी हे समजू देतच नाही. कोणीच दोषी नाही असे बुद्धी समजूच देत नाही.
प्रश्नकर्ता : तर यासाठी काय करावे?
दादाश्री : हे वाक्य जर तुमच्या अनुभवात आले तर तो अनुभवच तुम्हाला सांगेल. म्हणून प्रथम या वाक्याने सुरुवात करा. मग तो अनुभवच तुम्हाला सांगेल, म्हणजे मग बुद्धी शांत होऊन जाईल.
हे आहे ज्ञानाचे थर्मामीटर या जगाच्या 'सार' रुपात जर तुम्ही विचारले की, या जगाचे 'सार'