________________
प्रतिक्रमण
१७
मध्ये बोलणे हा गुन्हा आहे. खरी गोष्ट हिंसक नाही असायला पाहिजे. ही हिंसक गोष्ट म्हणावी.
आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान हा मोक्षमार्ग. आपले महात्मा काय करत आहेत? पूर्ण दिवस आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करत असतात. आता त्यांना सांगितले की 'तुम्ही या बाजूला चला, व्रत, नियम करा'. तेव्हा ते म्हणतात, 'आम्हाला व्रत-नियमांचे काय करायचे? आम्हाला आतमध्ये शांति आहे, आम्हाला चिंता नाही. निरूपाधि राहात आहे. निरंतर समाधिमध्ये राहिले जात आहे. मग कशासाठी हे?' उपधान तप, अमके तप, याला तर कटकट म्हणावी. हे तर गोंधळलेली माणसं करतात सर्व. ज्यांना आवश्यक आहे, आवड आहे. म्हणून आम्ही सांगत असतो की, हे तप तर हौसी लोकांचे काम आहे. संसाराची हौस असेल त्यांनी तप करायला हवे.
प्रश्नकर्ता : परंतु अशी मान्यता आहे की तप केल्याने कर्मांची * निर्जरा होत असते.
दादाश्री : असे कधीही होत नाही. कोणत्या तपने निर्जरा होते? आंतरिक तप पाहिजे. अदीठ (अदृश्य) तप, जे आम्ही सांगत असतो की हे आपले सर्व महात्मा अदीठ तप करत आहेत, जे तप डोळ्यांनी दिसत नसते. आणि डोळ्यांनी दिसणारे तप आणि जाणीव मध्ये येणारे तप या सर्वांचे फल पुण्य आणि अदीठ तप म्हणजे आतले तप, आंतरिक तप, बाहेर नाही दिसत या सर्वांचे फळ मोक्ष.
ह्या साध्वीजींना काय करायला पाहिजे. साध्वीजी जाणत असतात की स्वत:ला कषाय (क्रोध-मान-माया-लोभ) होत असतात, पूर्ण दिवस कषाय होत असतात. तर त्यांनी काय करायला पाहिजे? संध्याकाळी बसून एक पूर्ण गूणस्थान (४८ मिनिट) हे सर्व कषाय भाव झाले, ह्यांच्या बरोबर हा कषाय भाव झाला, ह्यांच्या बरोबर हा कषाय भाव झाला, असे त्या सर्वांनी एकत्र बसून प्रतिक्रमण करायचे, त्यांच्याच बरोबर. एकचित्तने प्रत्याख्यान करायचे की, पुन्हा असे नाही करणार, तर त्या मोक्ष मार्गवर चालल्या आहेत. *निर्जरा : (बांधलेले कर्म उदयात येवून पूर्ण होतात)