________________
१६
प्रतिक्रमण
सांगितले तर तुमच्या मनात भ्रम निर्माण होणार आणि असे बोलल्याने दुसऱ्या (प्रतिपक्षीय) लोकांच्या मनात उलटा परिणाम होणार की असे का बोलत आहेत? म्हणून मला दुसऱ्या (प्रतिपक्षीय) बाजूचे प्रतिक्रमण करावे लागेल रोज. असे बोलले गेले तर! कारण की त्यांना दु:ख तर नाहीच व्हायला पाहिजे. तो मानतो की या पिंपळाच्या झाडात भूत आहे, आणि मी सांगतो की भूत सारखी वस्तुच नाही या पिंपळाच्या झाडात. याचे त्याला दुःख होणार, म्हणून नंतर मला प्रतिक्रमण करावे लागते. हे तर नेहमीच करावे लागते ना!
प्रश्नकर्ता : दुसऱ्यांच्या समजूती प्रमाणे चुकीचे वाटत असेल तर त्याचे काय करायचे?
दादाश्री : हे जेवढे सत्य आहे ते सर्व व्यवहारिक सत्य आहे. ते सर्व खोटे आहे. व्यवहारपूरते सत्य आहेत. मोक्षात जायचे असेल तर सर्वच खोटे आहे. सर्वांचे प्रतिक्रमण करावे लागेल. 'मी आचार्य आहे' त्याचेही प्रतिक्रमण करावे लागेल. कारण की 'मी शुद्धात्मा आहे' म्हणून हे सर्वच खोटे आहे. सब झूठा, तुमच्या लक्षात आले की नाही?
प्रश्नकर्ता : आले च.
दादाश्री : सब झूठा. लोक नाही समजल्या कारणाने सांगतात की 'मी सत्य सांगत आहे'। अरे, सत्य बोलत असेल तर प्रत्याघात होणारच नाही.
असे आहे ना, की आम्ही ज्याक्षणी बोलतो त्याचक्षणी आमचे प्रतिक्रमण जोरदार चालत असते. बोलण्याच्या बरोबर च.
प्रश्नकर्ता : पण जी खरी बात आहे ती तुम्ही सांगतात त्यात काय प्रतिक्रमण करायचे?
दादाश्री : नाही, तरी सुद्धा प्रतिक्रमण तर करायलाच हवे ना! कोणाचा दोष तू का बघीतला? निर्दोष आहे तरी सुद्धा दोष का पाहिला? निर्दोष आहे तरी पण त्याची निंदा तर झाली ना? निंदा होईल अशी खरी गोष्ट पण नाही बोलायला हवी, खरी गोष्ट हा गुन्हा आहे. खरी गोष्ट संसार