________________
प्रतिक्रमण
असे तर काही करत नाही त्या बिचाऱ्या, तर कसे होईल? असा मोक्षमार्ग समजून घेतला तर त्याच्यावर चालू शकणार ना! समजण्याची जरूरी आहे.
प्रश्नकर्ता : जो पर्यंत त्याची प्रत्यक्ष क्षमा मागत नाही तो पर्यंत त्याच्यात अढी तर राहीलच ना! म्हणून प्रत्यक्ष क्षमा तर मागितलीच पाहिजे ना?
दादाश्री : प्रत्यक्ष क्षमा मागण्याची जरूरीच नाही. भगवंताने नाही सांगितले आहे. प्रत्यक्ष तर तुम्ही क्षमा मागायला जा, जर तो चांगला माणूस असेल तर, त्याची क्षमा मागायला जा आणि कमजोर माणसाची क्षमा मागायला जाशील तर तो डोक्यावर चापट मारेल. आणि तो कमजोर माणूस जास्त कमजोर होईल. म्हणून प्रत्यक्ष नका करू, जर प्रत्यक्ष करायचीच असेल तर खूपच भला माणूस असेल तरच करा. कमजोर असेल तर तो बदल्यात मारेल. आणि जग सर्व कमजोरच आहे. बदल्यात चापट मारणार. 'हं, मी सांगत होते ना, तू समजत नव्हती, मानत नव्हती, आता आली ठिकाणावर' अरे मेल्या, ती ठिकाणावरच आहे, ती बिघडलेली नाही, तू बिघडलेली आहे, ती सुधरलेली आहे, सुधरत आहे.
___ मोक्षमार्गात क्रियाकांड वगैरे असे काही होत नसते.फक्त संसारमार्गात क्रियाकांड होत असतात. संसारमार्ग म्हणजे, ज्यांना भौतिक सुख पाहिजे, दसरे काही पाहिजे, त्यासाठी क्रियाकांड आहे, मोक्षमार्गात असे काही नसते. मोक्षमार्ग म्हणजे काय? आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान. चालवितच जायची गाडी. तोच आपला हा मोक्षमार्ग आहे. त्यात क्रियाकांड आणि असे सर्व नाही होत ना!
आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान तोच हा मोक्षमार्ग. किती तरी अवतारापासून आमची ही लाइन, किती तरी अवतारापासून आलोचनाप्रतिक्रमण-प्रत्याख्यान करता करता येथपर्यंत आलो आहोत.
कषाय नाही करायचे आणि प्रतिक्रमण करायचे, हे दोनच धर्म आहेत. कषाय नाही करायचे हा धर्म आहे. आणि जर पूर्वकर्मानुसार कषाय होऊन गेला तर त्याचे प्रतिक्रमण करायचे हाच धर्म आहे. बाकी दुसरी काही