________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
प्रश्नकर्ता : मुलांच्या बापाचे डोके अजिबात चालत नसेल, काहीच कामकाज करत नसेल, मोटल चालवता येत नसेल, आणि घरात चार भिंतीच्या आत बसून रहात असेल, तर काय करावे?
दादाश्री : पण मग करायचे तरी काय?! दुसरा चांगला मिळेल की नाही याची काय खात्री?
प्रश्नकर्ता : ते तर नाहीच...
दादाश्री : दुसरा त्याहून खराब मिळाला, तर काय करशील? बऱ्याच स्त्रियांना असा मिळाला आहे. पहिला होता तो चांगला होता. अरे, सोडना झंझट, मग तिथेच पडून रहायचे होते ना! मनात हे सर्व समजायला नको का?
प्रश्नकर्ता : दादांवर सोपविले तर दूसरा चांगला मिळेल ना?
दादाश्री : चांगला मिळाला आणि तीन वर्षानंतर त्याला अटॅक आला, तर काय करशील? केवळ भीतीदायक ह्या संसारात कशासाठी हे सर्व....! जे घडले तेच करेक्ट असे मानून चालवून घेतले तर बरे. नाही का?
नेहमी, पहिला नवराच चांगला असतो, परंतु दुसरा तर भटक्याच असेल. कारण तो देखील अश्याच शोधात भटकत असतो. आणि तीही भटकत असते. तेव्हा दोघे एकत्र येतात ना! भटकणारे दोन ढोर एकत्र येतात. त्यापेक्षा तर पहिला होता तो चांगला! आपण त्याला जाणत तर असतो ना! तो रात्री गळा तर नाही दाबणार ना! असा तुम्हाला भरोसा तर असतो ना? आणि दुसरा तर गळा देखील दाबून देईल!
मुलांसाठी तरी स्वत:ला समजले पाहिजे. एक किंवा दोन मुले असतील पण ती बिचारी निराधार होऊन जातील ना! निराधार नाही म्हटली जाणार?
प्रश्नकर्ता : निराधारच मानले जाणार ना! दादाश्री : आई कुठे गेली? पप्पा कुठे गेले? एकदा स्वत:चा एक