________________
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
पाय कापला गेला असेल, तर जन्मभर निभाऊन नाही घेत का, की मग आत्महत्या करता?
पती वाईट वाटत नाही! वाईट वाटेल तेव्हा काय करणार? मग जरी पतीचे डोके जरा वेडे-वाकडे असेल, तरी पण लग्न केले आहे म्हणून माझे पती, अर्थात् माझा पती सर्वात उत्तम-बेस्ट असे बोलावे. तात्पर्य या दुनियेत वाईट असे काही नाही.
प्रश्नकर्ता : बेस्ट, असे बोललो तर पती डोक्यावर चढून बसतील.
दादाश्री : नाही, ते डोक्यावर चढून बसणारच नाहीत. पूर्ण दिवसभर बाहेर काम करत असतात ते बिचारे काय चढून बसणार? आपल्याला जो पती मिळाला आहे त्यालाच निभाऊन घ्यावे, दुसरा पती थोडेच ना आणणार आहात? विकत मिळतात का? काही उलट-सुलट कराल, डायवोर्स (घटस्फोट) घ्यावा लागला, ते उलट खराब दिसेल. तो पण विचारेल की डायवोर्सवाली आहे ? तेव्हा मग दुसरीकडे कुठे जाल?! त्यापेक्षा ज्या एका बरोबर लग्न केले आहे त्यालाच निभाऊन घ्या. सगळीकडे असेच असते. आपल्याला त्याच्याशी जमत नसते, पण काय करणार? आता जाणार कुठे? म्हणून त्याचा निकाल लावा.
आपले भारतीय किती नवरे बदलतात? हा एकच केला तोच...... जो मिळाला तो खरा. त्यालाच निभावून घ्या. आणि पुरुषांनी देखील जशी स्त्री मिळाली असेल तशी, कटकट करत असेल, तरी पण तिचा निवाडा करुन टाकलेले बरे. ती काही तुमच्या पोटात शिरुन चावणार आहे? ती तर बाहेर बोंबाबोंम करेल किंवा तोंडाने शिव्या देईल, पण पोटात शिरून चावली तर काय कराल तुम्ही? असे आहे हे सर्व. रेडियोच (बोलत) आहे. पण तुम्हाला समजत नाही की हे वास्तवात कोण करत आहे ? तुम्हाला तर असेच वाटेल की हे सर्व तर खरोखर तीच बोलत आहे. मग तिलाही पश्चाताप होतो की अरेरे, मला असे बोलायचे नव्हते आणि तरीही बोलले गेले. तर मग ती करते की रेडियो करतो?
एकीचा संसार मुंबईत फ्रेक्चर होणार होता. पतीने दुसरा गुप्त संबंध ठेवला असेल आणि त्या बाईला ते माहित पडले, म्हणून जबरदस्त भांडण