________________
५०
पति-पत्नीचा दिव्य व्यवहार
दिवसभर काम करता-करता पतीचे प्रतिक्रमण करत रहायचे. एका दिवसात सहा महिन्याचे वैर सुटून जाईल, आणि अर्धा दिवस केले तर, तीन महिन्याचे वैर तरी सुटेल. लग्नापूर्वी नवऱ्यावर ममता होती? नाही ना. मग ही ममता केव्हापासून बांधली गेली? लग्नाच्या वेळी मंडपात समोरासमोर बसलात त्यावेळी तु नक्की केले की, 'हे माझे पती आले. जरा जाड आहेत आणि सावळे ही आहेत.' मग त्यानेही नक्की केले की, 'ही माझी पत्नी आली.' तेव्हापासूनच जे 'माझे-माझी'चे आटे फिरले गेले ते आटे फिरतच राहिले. ही पंधरा वर्षाची फिल्म आहे अर्थात तू त्याला 'नाही माझा, नाही माझा' करशील तर ते आटे उलगडतील आणि ममता सुटेल. हे तर लग्न झाले तेव्हापासून अभिप्राय बांधला गेला, 'प्रिज्युडीस' (पूर्वग्रह) निर्माण झाला की, 'हे असे आहेत, तसे आहेत.' पण त्या पूर्वी असे काही होते का? आता तर तुम्हाला मनात नक्की करायचे आहे की, 'जे आहे ते हेच आहे.' आणि आपण स्वतः पसंत करुन आणले आहे. आता पती बदलता येईल
का?
१५. परमात्म प्रेमाची ओळख ह्या संसारात जर कोणी म्हणेल की, ह्या स्त्रीचे प्रेम, हे प्रेम नाही ? तेव्हा मी त्यांना समजावेल की, जे प्रेम कमी-जास्त होते ते खरे प्रेम नाही. तुम्ही हिऱ्यांच्या कुड्या आणून दिल्या तर त्या दिवशी तिचे प्रेम खूप वाढते, आणि जर कुड्या नाही आणल्या तर प्रेम कमी होते, हे खरे प्रेम म्हणत नाही.
प्रश्नकर्ता : खरे प्रेम वाढत-घटत नाही, तर त्याचे स्वरुप कसे असते?
दादाश्री : ते वाढत-घटत नाही. जेव्हा पहाल तेव्हा प्रेम जसेच्या तसेच दिसते. हे तर तुम्ही त्यांचे काम करुन दिले तर त्यांचे तुमच्यावर प्रेम राहते. आणि काम केले नाही तर प्रेम राहत नाही. यास प्रेम कसे म्हणायचे?
अर्थात् जिथे स्वार्थ नाही तिथे शुद्ध प्रेम असते. स्वार्थ केव्हा नसतो, तर जेव्हा तुझे-माझे होत नाही तेव्हा. 'ज्ञान' असते तेव्हा माझे-तुझे होत नाही. 'ज्ञान' शिवाय तर माझे-तझे होतेच ना?